आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची भावना कायम स्वरूपी जनमाणसात रहावी, या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यभरात राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम अहमदनगर जिल्ह्यात 8 लाख 99 हजार 666 घरांवर फडकणार तिरंगा फडकणार आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी दिली.
अहमदनगर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 1 लाख 96 हजार 905 असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 7 लाख 2 हजार 761 इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर 7 लाख 80 हजार 577 झेंडे उपलब्ध होणार असून, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 1 लाख 19 हजार 89 लाख झेंडे पुरविण्यात येणार आहेत. असे भोसले यांनी सांगितले.
नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा
जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद तसेच शासनाच्या विविध विभागांच्यावतीने यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.