आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोपरगाव शहरातील गोदावरी पेट्रोल पंप ते कोठारी घर व अनिकेत भडकवाडे घर ते निवारा या दोन रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी या दोनही रस्त्यांचे नूतनीकरण करा, अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही रस्त्यांच्या दुरावस्था झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांची अडचण होत आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दोन वर्षानंतर पूर्ण क्षमतेने शाळा महाविद्यालये सुरू झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याने शाळेतील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिक या रस्त्याने येत नाही त्याचा व्यवसायावर परिणाम होतो. पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी श्रीसाईबाबा संस्थान च्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांना देखील नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांची कामे झाली आहेत. त्याप्रमाणे नागरिकांना होत असल्या त्रासाची दखल घेऊन या रस्त्यांचेही नूतनीकरण करावे, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कृष्णा आढाव, अनिरुद्ध काळे,सोमनाथ आढाव, संतोष शेजवळ, राजेंद्र सावतडकर राजेंद्र पाखले, अनिकेत भडकवाडे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.