आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक तरूणांसाठी शासनाच्या वतीने ‘मार्जिन मनी योजना’ राबविली जाते. या योजनेतील सबसिडीचा लाभ नवउद्योजक तरूणांनी घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्ह्यात संविधान दिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत ‘समता पर्वाचे’ आयोजन करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा उद्योग केंद्राचे बालाजी बिराजदार, तात्यासाहेब जीवडे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद आणि उद्योजक जितेंद्र तोरणे आदी उपस्थित होते. स्टँण्ड अप इंडिया’ योजनेत नवउद्योजकांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर बँकेकडून ७५ टक्के कर्ज मंजूर होते. उर्वरित फ्रंट एंड सबसिडी स्वरूपात नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या १५ टक्के अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात १२५ युवागटांची स्थापना करण्यात आली आहे. या युवागटांशी १ हजार ४३९ तरूण जोडले गेले आहेत, असे देवढे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.