आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:संतांची जयंती दर्शन घेण्यासाठी नव्हे,‎ तर त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी‎

नगर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संतांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी‎ समाजाने एकत्र येण्याची गरज आहे.‎ संत, महात्मा व महापुरुषांची जयंती‎ दर्शन घेण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या‎ विचारांचे पाईक होण्यासाठी असते.‎ त्यांच्या विचारांमध्ये मानवजातीचे‎ कल्याण आहे. हा विचार घेऊन चर्मकार‎ विकास संघ सातत्याने समाजोपयोगी‎ कार्य करीत असल्याचे प्रतिपादन‎ आमदार संग्राम जगताप यांनी केले.‎

चर्मकार विकास संघ, लोकनेते मा.‎ आ. सितारामजी घनदाट (मामा)‎ सामाजिक प्रतिष्ठान व रवीदास चेंबर्स‎ ऑफ कॉमर्स इंडस्ट्री यांच्या संयुक्त‎ विद्यमाने संत गुरु रविदास महाराज‎ यांच्या ६४६ वी जयंती विविध धार्मिक व‎ सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात‎ आली. चर्मकार विकास संघाच्या‎ नगर-मनमाड रोड, सावेडी येथील मुख्य‎ कार्यालयात झालेल्या जयंती उत्सव‎ सोहळ्यात जगताप यांच्या हस्ते‎ सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले‎ मोफत वृत्तपत्र वाचनालय व गटई‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.‎ त्यावेळी जगताप बोलत होते.‎

प्रारंभी संत गुरु रविदास महाराजांची‎ आरती करुन महापुरुषांच्या प्रतिमांना‎ अभिवादन करण्यात आले. या वेळी‎ चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष‎ संजय खामकर, सर्जेराव गायकवाड,‎ नगरसेवक सुनील त्र्यंबके, डॉ. सागर‎ बोरुडे, नीलेश बांगरे, कवी सुभाष‎ सोनवणे, तायगा शिंदे, आदिनाथ‎ बाचकर, महिला जिल्हाध्यक्षा रुक्मिणी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नन्नवरे, रामदास सातपुते, प्रमोद भारुळे,‎ रामदास उदमले, श्रीपती ठोसर, रामराव‎ ज्योतिक, संपत नन्नवरे, गिरीश केदारे,‎ विलास जतकर, अरविंद कांबळे,‎ भाऊसाहेब आंबेडकर, दादासाहेब‎ क्षीरसागर आदी उपस्थित होते.‎

प्रदेशाध्यक्ष संजय खामकर म्हणाले‎ की, समाजाला दिशा देण्याच्या उद्देशाने‎ जयंती दिनी सामाजिक उपक्रम‎ राबविण्यात आला. समाज विकासाच्या‎ दिशेने वाटचाल करत आहे. चर्मकार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात १ लाख‎ सदस्य असून, १२ हजार पदाधिकारी‎ महाराष्ट्रात कार्यरत आहे. नगरसेवक‎ सुनील त्र्यंबके यांनी जयंतीच्या शुभेच्छा‎ दिल्या. यावेळी उपस्थितांच्या हस्ते‎ चर्मकार विकास संघाच्या दिनदर्शिकाचे‎ प्रकाशन करण्यात आले. पाहुण्यांचे‎ स्वागत पुस्तके देऊन करण्यात आले.‎ सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष अशोक‎ कानडे यांनी केले. संतोष कानडे यांनी‎ आभार मानले.‎

डॉ. आंबेडकरांनी साजरी‎ केली पहिली जयंती‎संतांचे विचार जीवनाला दिशा देतात. संत‎ रविदास महाराजांना गुरुस्थानी मानून‎ त्यांची पहिली जयंती डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकरांनी साजरी केली होती. ज्ञान व‎ विचारांचे बाळकडू भावी पिढीला‎ देण्यासाठी संतांचे विचार वाचा, घरात‎ संविधान ठेवा, कायदा अभ्यासा, लूट‎ होणार नाही. ज्ञान नसल्यास लूट होत‎ असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष‎ सोनवणे यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...