आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी मंगळवार 14 मार्च पासून बेमुदत संप सुरू केला असून, कर्मचारी संघटनांच्या वतीने मंगळवारी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात विविध सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांसह शिक्षक, परिचारिका व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान या संपामुळे अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज देखील ठप्प झालेले दिसून येत होते विविध विभागात सकाळपासूनच शुकशुकाट दिसत होता. जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील असा इशारा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमाळे यांच्या नेतृत्वाखालीराज्यातील सरकारी -निमसरकारी सरकारी शिक्षक,शिक्षकेतर ,महापालिका,नगरपालिका नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी संघटनेच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करा, सर्व रिक्त पदे भरा, निवृत्तीचे वय 60 वर्षे करा, नवीन शिक्षण धोरण रद्द करा, केंद्र प्रमाणे वाहतूक शैक्षणिक व इतर भत्ते द्यावेत, शिक्षणसेवक, ग्रामसेवकांना देण्यात येणाऱ्या मानधनात महागाईचा विचार करून वाढ द्यावी.
शासकीय विभागात खाजगीकरण कंत्राटीकरण करू नये,या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने हा बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा आंधळे यांच्यासह परिचारिका या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
संपाच्या पार्श्वभूमीवर विविध शाळा, महाविद्यालये, जिल्हा परिषद कर्मचारी व अन्य सरकारी कर्मचारी संघटनांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जुन्या पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर बोलवलेल्या बैठकीत कुठलाही जुन्या पेन्शन बाबत तोडगा न निघाल्याने आम्ही हा संप सुरू केला आहे. असे संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मंगळवारी सांगितले.
राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या आदेशाने आम्ही सर्व संपावर गेलो आहोत. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत बेमुदत मुदत संप सुरूच राहील.
आपत्कालीन स्थितीत कुठली अडचण आल्यास काही कर्मचाऱ्यांच्या नेमणुका आम्ही केलेल्या आहेत जेणेकरून रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांची हाल होणार नाहीत. असेही तळेकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान या संपामुळे अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले तसेच अनेक विभागात कर्मचारी उपस्थित नसल्याने शुकशुकाट दिसून येत होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.