आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडे बोल:अहमदनगर मनपाला 5 कोटी रुपयांचे‎ पारितोषिक कशाच्या आधारे दिले?‎; जागरूक नागरिक फोरमचा मंत्रालयाला सवाल‎

अहमदनगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर‎ शहरात अस्वच्छता, खड्डेयुक्त रस्ते ही मोठी समस्या आहे. असे असतानाही नगर शहराला‎ शहर सौंदर्यीकरणाचा पाच कोटी रुपयाचा‎ पुरस्कार दिला गेला. हा पुरस्कार कशाच्या ‎आधारावर आणि कुठल्या भागाचे निरीक्षण‎ करून दिला? असा सवाल जागरूक नागरिक फोरमने मंत्रालयाला केला आहे.

प्रत्यक्षात नगरमधील स्वच्छतेची व गटारीची बिकट‎ अवस्था आहे. शहरातील समस्यांचे वास्तव ‎ ‎ तपासण्यासाठी मंत्रालयातील प्रामाणिक‎ अधिकारी नगरमध्ये सरप्राइज व्हिजीटला‎ पाठवावेत, अशी मागणी जागरूक नागरीक‎ फोरमचे सुहास मुळे यांनी केली आहे.‎

मुळे म्हणाले की, महापौरांनी देखील‎ महानगरपालिकेतील कामचुकार अधिकाऱ्यांची‎ किती वाईट अवस्था आहे, याची कल्पना दिली‎ आहे. हे अधिकारी खरंच पगाराइतके काम‎ करतात का, वार्डनिहाय कधी आढावा घेतात‎ की नाही? याचे पोस्टमार्टम होणे गरजेचे आहे.‎

आपण मंत्रालयातून पाठवलेला रस्ते, पाणी,‎ गटारीसाठीचा निधी, स्वच्छतेचे दिलेले खोटे‎ पुरस्कार आणि प्रत्यक्षात असलेली वाईट‎ परिस्थिती याची कल्पना तपासणी केल्यावर‎ येईल. नगर शहराचे आपत्ती व्यवस्थापनच कसे‎ आपत्तीग्रस्त आहे, हेही समोर येईल. याचा‎ गांभीर्याने विचार करावा, असेही जागरूक‎ नागरिक फोरम मंचच्या वतीने निवेदनात म्हटले‎ आहे.‎शहरातील अस्वच्छतेचे वास्तव दर्शविणारे चित्र‎ सुहास मुळे यांनी सादर केले आहे.‎