आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:दरोडेखोरांच्या मारहाणीमध्ये‎ एक ठार, 50 हजारांची चोरी‎

श्रीगोंदे‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील‎ दिवटे वस्तीवर १३ मार्च रोजी मध्यरात्री ५‎ते ६ जणांनी सशस्र‎दरोडा घातला.‎दरोडेखाेरांच्या‎मारहाणीत कल्याण‎मच्छिंद्र गायकवाड‎(वय ४२) यांचा मृत्यू‎झाला. दरोडेखोरांनी‎गायकवाड यांच्या‎घरातून पाच हजार‎ रुपये, सोन्याच्या दागिन्यांसह ५० हजार‎ रुपयांचा ऐवज लंपास केला.‎

सविस्तर माहिती अशी : श्रीगोंदे‎ तालुक्यातील बेलवंडी पोलिस‎ ठाण्याअंतर्गत अरणगाव दुमाला येथील‎ दिवटे वस्तीवर कल्याण गायकवाड‎ यांच्या राहत्या घरात १३ मार्चला मध्यरात्री‎ ५ ते ६ दरोडेखोरांनी प्रवेश केला. दमदाटी‎ व मारहाण करीत त्यांनी कल्याण‎ गायकवाड यांच्या पत्नीच्या गळ्यातील,‎ तसेच मुलीच्या कानातील सोन्याचा ऐवज‎ हिसकावून घेतला.

नंतर घरातील रोख ५‎ हजार रुपये घेतले. यावेळी कल्याण‎ गायकवाड यांनी दरोडेखोरांना प्रतिकार‎ करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी‎ गायकवाड यांच्यावर प्रतिहल्ला करीत‎ टणक हत्याराने जबर मारहाण केली. त्यात‎ डोक्याला गंभीर जखम झाल्याने,‎ रक्तस्त्राव होऊन गायकवाड यांचा‎ जागीच मृत्यू झाला.‎ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच‎ बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक‎ संजय ठेंगे यांच्यासह मोठा फौज फाटा‎ दिवटे वस्तीवर हजर झाला.‎ घटनास्थळाचा पंचनामा करण्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आला. मृत कल्याण गायकवाड यांचा‎ मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी श्रीगोंदे‎ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात‎ आला. ‎

अरणगावचे ग्रामस्थ संतापले‎
दिवटे वस्ती येथील दरोडा व खुनाचा‎ तपास लागत नाही, तोपर्यंत गायकवाड‎ यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा‎ पवित्रा अरणगाव येथील नागरिकांनी‎ घेतला. त्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण‎ झाला होता. त्यात बेलवंडी पोलिस‎ ठाण्यात गेल्या एकाच महिन्यात तीन‎ पोलिस निरीक्षक बदलल्याने पोलिस‎ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये ताळमेळ‎ नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बेलवंडी‎ पोलिस स्टेशनअंतर्गत गुन्ह्याचे प्रमाण‎ वाढल्याचे दिसत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...