आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या तीन दिवसांपासून नगर जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. नगर शहरसह जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी (६ मार्च) सायंकाळी सातच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. हलक्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.
हवामान विभागाने नगर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार सायंकाळी पाच वाजेपासून विजांचा कडकडाट सुरू झाला होता. सायंकाळी सात वाजता शहरातील अनेक भागात हलक्या पावसाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, सायंकाळी सात वाजता घरोघरी होळी पेटवण्याची तयारी सुरू असतानाच पावसाचे आगमन झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या गहू घरात घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
त्याचबरोबर काही भागात काढणीला आलेला गहू भिजला. तसेच, हरभरा पिकालादेखील अवकाळीचा फटका बसला. अवकाळी पावसाच्या हजेरीने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, तापमान घसरले आहे. दिवसभर शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. नेवासे तालुक्यातील भेंडा, कुकाण येथेही अवकाळी पावसाने हजेरी लावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.