आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद‎:जिल्ह्यात 500 वाढीव कर्मचाऱ्यांसाठी प्रस्ताव‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात अधिक पोलिस कर्मचाऱ्यांची‎ आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाकडे‎ वाढीव ५०० कर्मचारी मिळावेत, यासाठी‎ प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती‎ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस‎ महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी‎ दिली. तसेच गुन्हेगारांच्या शोधासाठी,‎ त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी‎ ''क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम'' या संगणक‎ प्रणालीचा वापर पाच जिल्ह्यात केला‎ जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.‎

बुधवारी सायंकाळी त्यांनी शहरातील‎ कोतवाली पोलिस ठाण्यास भेट दिली.‎ त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद‎ साधला. ''क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम''‎ प्रणालीची माहितीही त्यांनी दिली. यावेळी‎ जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अपर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक‎ अनिल कातकडे, निरीक्षक संपत शिंदे‎ आदी उपस्थित होते.‎ ‘

गुगल’चा वापर करून संगणक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रणालीद्वारे गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी‎ त्याचे प्रोफाइल तयार करणे, गुन्हेगारावर‎ कोण पोलिस कर्मचारी, केव्हापासून लक्ष‎ ठेवून आहे, पोलिस कर्मचाऱ्याने संबंधित‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गुन्हेगाराची पडताळणी केव्हा केली,‎ याची सर्व अद्ययावत माहिती या ॲपद्वारे‎ वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळणार‎ असल्याचे त्यांनी सांगितले.‎

उड्डाणपुलावर आता‎ वेगमर्यादा‎ शहरामध्ये उड्डाणपूल झाला. मात्र‎ त्यावर अपघातही वाढल्याने त्याची‎ दखल महानिरीक्षक डॉ. शेखर यांनी‎ घेतली आहे. उड्डाणपूलावरुन‎ धावणाऱ्या वाहनांसाठी वेग मर्यादा‎ लागू केली जाणार असून, तशी ५०‎ किमीपेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या‎ वाहनांवर कारवाई केली जाईल,‎ त्यासाठी स्पीड लिमिट बोर्ड, स्पीडगन,‎ कर्मचारी नियुक्ती आदी उपाययोजना‎ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.‎

बेपत्ता व्यक्तींच्या‎ शोधासाठी मोहीम‎
पुढील महिनाभरात विविध शोध मोहिमा‎ राबवण्याचे आदेशही महानिरीक्षक डॉ.‎ शेखर यांनी जिल्हा पोलिस दलास दिले‎ आहेत. मादक पदार्थ विक्री, गावठी‎ कट्टे, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे,‎ यासाठी आगामी एक महिन्यात मोहीम‎ राबविण्यात येणार आहे. गावठी कट्टा‎ बाळगणाऱ्यासह व त्याला कट्टा‎ विकणाऱ्याला मालकाला पकडले तर ५‎ हजारांचे बक्षीस दिले जाणार‎ असल्याचेही त्यांनी जाहीर केले.‎

ब्लॅक स्पॉट कमी‎ करण्यासाठी उपाययोजना‎
जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या दृष्टीने‎ ''ब्लॅकस्पॉट'' निश्चित करण्यात आले‎ होते. हे ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी‎ वाहतूक निरीक्षक व उपअधीक्षकांवर‎ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे‎ पाठपुरावा करण्याची जबाबदारी‎ देण्यात आली आहे. रस्त्याची‎ परिस्थिती सुधारली आहे की नाही,‎ यासाठी पूर्वीचे व उपाययोजना‎ केल्यानंतरचे छायाचित्र मागवून घेतले‎ जाते, असेही ते म्हणाले.‎

उड्डाणपुलावर आता‎ वेगमर्यादा‎
शहरामध्ये उड्डाणपूल झाला. मात्र‎ त्यावर अपघातही वाढल्याने त्याची‎ दखल महानिरीक्षक डॉ. शेखर यांनी‎ घेतली आहे. उड्डाणपूलावरुन‎ धावणाऱ्या वाहनांसाठी वेग मर्यादा‎ लागू केली जाणार असून, तशी ५०‎ किमीपेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या‎ वाहनांवर कारवाई केली जाईल,‎ त्यासाठी स्पीड लिमिट बोर्ड, स्पीडगन,‎ कर्मचारी नियुक्ती आदी उपाययोजना‎ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...