आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांवर एका वर्षात अनेक वेळा आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. परंतु याकडे शासनाने वेळोवेळी दुर्लक्ष केल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले आहे. पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्याचे कुटुंब नैसर्गिक आपत्तीला तोंड देत आहे. सरकारने शेतकऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. याचाच निषेध म्हणून शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथील शेतकरी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंड झोडून अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
शेतकरी बाळासाहेब शिंदे, सदाशिव शिंदे, नारायण गवांडे, रामराव बेडके, एम.के.लाकडे, विजय रणदिवे, भाऊसाहेब उंदरे, सर्जेराव बेडके, विलास माळी, भाऊराव गोलवड, एकनाथ इथापे, जगन्नाथ शिंदे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्तीमध्ये नासाडी होऊन व कवडीमोल मिळालेल्या बाजार भावाने शेतकऱ्यांच्या कुटुंबाची स्वप्न धुळीस मिळाली. याचाच गांभीर्य सरकारने घेतला नाही. शेतकरी अन्नदाता आज कर्जबाजारी होऊन आर्थिक, मानसिक व नैसर्गिक संकटात सापडून मेटाकुटीला आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.