आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:कांद्याच्या माळा गळ्यात घालून‎ रासपच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन‎

नगर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कांद्याचे भाव गडगडल्याने‎ शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी‎ आणले आहे. कांदाउत्पादक कर्जबाजारी‎ होत आहेत. सरकारने त्वरित कांद्यास तीन‎ हजार रुपये हमीभाव व विकलेल्या‎ कांद्यास एक हजार रुपये अनुदान जाहीर न‎ केल्यास, रासपतर्फे राज्यात तीव्र आंदोलन‎ करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष काशीनाथ‎ शेवते यांनी दिला.‎ कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव‎ द्यावा, तसेच एक हजार अनुदान देण्याच्या‎ मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या‎ पदाधिकाऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा‎ घालून गुरुवारी (२ मार्च) जिल्हाधिकारी‎ कार्यालयासमोर आंदोलन केले.‎

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना‎ निवेदन देण्यात आले. या वेळी रासपचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य‎ सचिव रवींद्र कोठारी, उत्तर महाराष्ट्र‎ अध्यक्ष शरद बाचकर, नगर जिल्हाध्यक्ष‎ शहाजी कोरडकर, शहर अध्यक्ष चिमाजी‎ खामकर आदींसह पदाधिकारी उपस्थित‎ होते. मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर,‎ राज्य सचिव रवींद्र कोठारी यांनी भावना‎ व्यक्त केल्या.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात‎ म्हटले आहे, की यंदा राज्यात मोठ्या‎ प्रमाणात कांदाउत्पादन झालेय. त्यामुळे‎ बाजारपेठेत आवक वाढल्याने कांद्याचे‎ भाव गडगडले आहेत. शेतकऱ्यांना कांदा‎ पिकविण्यासाठी क्विंटलमागे दीड हजार‎ रुपये खर्च येतो.

आज बाजारात ३०० ते‎ ५०० रुपये क्विंटल या दराने कांदा विकला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जात आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी‎ होणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना‎ विकलेल्या कांद्यासाठी प्रति क्विंटल एक‎ हजार रुपये अनुदान व प्रति क्विंटल‎ किमान तीन हजार रुपये हमीभाव द्यावा,‎ अन्यथा रासपच्या वतीने राज्यभर तीव्र‎ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला‎ आहे.‎

गोल्टी कांदा ३ रुपये किलो‎
बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात‎ लाल कांद्याची आवक सुरू आहे.‎ कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेली‎ घसरण शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी‎ आहे. एक नंबर कांदा ८०० ते ११०० रुपये‎ प्रति क्विंटल, तर गोल्टी कांदा ३०० ते ६००‎ रुपये प्रति क्विंटल दराने वांबोरी बाजार‎ समितीत गुरुवारी विकला गेला.‎

बातम्या आणखी आहेत...