आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा उपक्रम:पालावरच्या मतदारांशी‎ संवाद साधून जनजागृती‎‎

श्रीरामपूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य निवडणूक आयोगाच्या‎ आवाहनाला अनुसरून‎ नवमतदारांना प्रोत्साहित करणेसाठी‎ विविध प्रयत्न केले जात आहेत.‎ त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक‎ शाळेवर विद्यार्थ्यांचा समावेश‎ असलेला मतदार जागृती मंच‎ स्थापन करण्यात आला आहे.‎ त्यांच्या माध्यमातून तालुक्यात‎ मतदार जागृती करण्याचे मोठे काम‎ केले जात आहे.‎ दरवर्षी राष्ट्रीय मतदार‎ दिनानिमित्त शाळा व महाविद्यालय‎ स्तरावर विविध स्पर्धा घेण्यात‎ येतात.

यावेळी प्रथमच मतदार‎ दिननिमित्त मतदार जागृती सप्ताह‎ आयोजित करण्यात आला होता.‎ यावेळी मतदार नोंदणी अधिकारी‎ तथा उपविभागीय अधिकारी अनिल‎ पवार, सहाय्यक मतदार नोंदणी‎ अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत‎ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली‎ नायब तहसीलदार हेमलता वाकडे,‎ स्वीप समन्वयक शकील बागवान‎ आणि संदीप पाळंदे यांनी‎ तालुक्यातील प्रत्येक शाळा व‎ वक्तृत्व, निबंध, चित्रकला, रांगोळी‎ आणि घोषवाक्य स्पर्धा घेण्यात‎ आल्या.

बेलापूरच्या जेटीएस‎ महाविद्यालयात प्राचार्य श्रीराम‎ कुंभार, उपप्राचार्या सुनीता ग्रोव्हर‎ यांच्या सहकार्याने तसेच नोडल‎ अधिकारी राहुल जेजूरकर यांच्या‎ मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या‎ मतदार जागृती मंचची प्रमुख‎ प्राजक्ता नरवडे, श्रावणी काळे,‎ भक्ती बर्गे, पल्लवी गायकवाड,‎ ज्ञानेश्वरी आंबेकर, इशिता‎ सोनवणे, ओमकार टाकसाळ,‎ अनिकेत काळे, किरण म्हस्के व‎ यशवंत भोर आदींनी बेलापूर‎ रोडवरील शेतीची औजारे बनवणारे‎ तसेच उघड्यावर पाल टाकून‎ वास्तव्य करणाऱ्या तसेच रहिवास‎ पुराव्याअभावी मतदार नोंदणीसाठी‎ संघर्ष कराव्या लागलेल्या घिसाडी‎ समाजातील मतदारांशी संवाद‎ साधला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...