आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे निर्देश:नागरिकांनी जनता दरबारात दिलेल्या तक्रारींचे प्रशासकीय यंत्रणांनी 15 दिवसांत निवारण करा

अहमदनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरिकांनी जनता दरबारात दिलेल्या तक्रारींचे प्रशासकीय यंत्रणांनी 15 दिवसांत निवारण करावे, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी (6 मार्च) ला दिले.विखे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी व राहता येथे जनतेच्या विविध समस्या व प्रश्न जाणून घेतले त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे आदी यावेळी उपस्थित होते.

तक्रारींचे शासकीय यंत्रणांनी 15 दिवसांत निवारण करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री विखे यांनी विविध विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे यांनीही जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.

जनता दरबारात पालकमंत्र्यांकडे नागरिकांनी महसूल, कृषी, जिल्हा परिषद, पोलिस , नगरपालिका, महसूल आणि विद्युत विभागाशी संबंधित अशा तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारींची त्वरीत दखल घेवून त्याचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

पालकमंत्र्यांनी जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेतला. या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अनुपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश ही विखे यांनी यावेळी दिले.

राहूरी येथे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व कृषी अवजारे यांचे वाटप करण्यात आले. राहाता येथे काही लाभार्थ्यांना पंतप्रधान 'ई-श्रम कार्ड'चे वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...