आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने‎:जिल्हा परिषदेतील नोकर भरतीत वशिलेबाजी‎

नगर‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेतील सरळ सेवेतील‎ कर्मचारी भरतीपैकी १० टक्के नोकर भरती,‎ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून केली जाते.‎ या भरतीतील वशीलेबाजी होत‎ असल्याचा आरोप करत पात्र कर्मचाऱ्यांना‎ निवडीसाठी आमंत्रित करावे, या राणिसती‎ आयटक संलग्न ग्रामपंचायत कर्मचारी‎ महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने‎ जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली.‎ या आंदोलनात संघटनेचे राज्य‎ उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर टोकेकर, ज्ञानदेव‎ नरोटे, संतोष आल्हाट, सुर्यकांत आव्हाड,‎ रामदास वाघमारे, विजय शिंदे, सोमनाथ‎ गोल्हार, अनिल नेटके, मच्छिंद्र शिंदे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सविता गोसावी, ज्ञानदेव ढवळे, सुनील‎ शिंदे, रामनाथ खेडकर, गणेश साळुंके‎ आदी उपस्थिती होते.‎ जिल्हा परिषदेत सरळ सेवतून १० टक्के‎ नोकर भरती, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून‎ व्हावी, यासाठी ज्येष्ठता यादी तयार केली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे.

या यादीवर हरकती मागवल्यानंतर,‎ अंतिम यादी १६ फेब्रुवारीला जाहीर केली.‎ या यादीतून जिल्ह्यातील ३५ कर्मचाऱ्यांना‎ १५ मार्चला कागदपत्र पडताळणीसाठी‎ बोलवले आहे. अंतिम यादीत अकोले‎ तालुक्यातील दहा कर्मचारी बाकीच्या‎ ठिकाणचे दोन ते तीन कर्मचाऱ्यांच्या‎ नावाचा समावेश नाही. संगमनेर तालुका व‎ शेवगाव तालुक्यातील एकाही‎ कर्मचाऱ्याचे नाव नाही, तसेच एकाही‎ महिलेचे यात नाव नाही. नेवासे‎ तालुक्यातील प्रवरासंगम येथील गोसावी‎ समाजातील भटक्या जमाती प्रवर्गातील‎ महिलेचे नावही या यादीत नसल्याने‎ तक्रारी होत आहेत.‎ संघटनेच्या शिष्टमंडळाने मागणीचे‎ निवेदन देऊन उपमुख्य कार्यकारी‎ अधिकारी सुरेश शिंदे यांना देऊन चर्चा‎ केली. त्यावर शिंदे यांनी अजूनही हरकती‎ नोंदवता येणार आहेत. कोणाचे कागदपत्र‎ व अपुरी माहिती असेल तर ती दाखल‎ करावी, असे सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...