आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरुपण‎:भगवंताच्या नामस्मरणामुळे‎ जीवन होते सुखी : बारस्कर‎

नगर‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी जीवनामध्ये सुख-दुःख प्रत्येकाला‎ असते. सुखात असाल तरी उतमात करू नका व‎ दुःखात असताना शोक व्यक्त करू नका.‎ संकटाच्या काळात परमेश्वराचे स्मरण केल्याने‎ ते भक्ताच्या हाकेला धावून येतात व आपल्याला‎ मार्ग दाखवतात. भगवंताचे नाव घेणे सहज शक्य‎ आहे. जीवनात प्रगती करण्यासाठी प्रत्येकाने‎ साधुसंतांच्या विचाराने जगावे. या माध्यमातून‎ दुर्गुण नष्ट होण्यासाठी मदत होते, असे निरुपण‎ अजय महाराज बारस्कर यांनी केले.‎

श्री जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान व‎ माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने‎ आयाेजित हरिनाम सप्ताहाच्या सांगता कीर्तनात‎ मार्गदर्शन करताना बारस्कर महाराज बाेलत हाेते.‎ याप्रसंगी खासदार सुजय विखे, माजी मंत्री‎ शिवाजी कर्डिले, वसंत लोढा, अभय आगरकर,‎ रवींद्र बारस्कर, उदय कराळे, आशा कराळे, दत्ता‎ सप्रे, जालिंदर बोरुडे, मोहनशेठ मानधना, नितीन‎ शेलार उपस्थित होते.‎ बारस्कर महाराज म्हणाले, संत तुकाराम‎ महाराजांनी डोंगरावर तपश्चर्या करून पांडुरंगाचे‎ नामस्मरण केले. त्यांनी गोरगरीब दीनदुबळे‎ यांच्यात देव पाहिला व त्यांची आयुष्यभर सेवा‎ केली.‎

बातम्या आणखी आहेत...