आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरण:संगमनेरला विजेबाबत स्वयंपूर्ण करा‎

संगमनेर‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎विजेबाबत संगमनेर तालुका स्वयंपूर्ण‎ करण्याचे स्व. भाऊसाहेब थोरात यांचे‎ प्रयत्न होते. साखर कारखान्याने‎ वीजनिर्मिती केली, मात्र सौरऊर्जेच्या‎ माध्यमातून सर्व सहकारी संस्थांच्या‎ पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन तालुका‎ विजेबाबत स्वयंपूर्ण करावा. थोरात यांची‎ जन्मशताब्दी पुढील वर्षी आहे. या काळात‎ निळवंडे धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळेल,‎ मात्र आपण यानिमित्त जनतेच्या‎ विकासासाठी महत्वपूर्ण योजनाचा संकल्प‎ करावा, असे आवाहन प्रा. हिरालाल‎ पगडाल यांनी केले आहे.‎ अमृत उद्योग समूहाच्या वतीने थोरात‎ कारखाना येथील प्रेरणास्थळावर स्वातंत्र्य‎ सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या १३ व्या‎ स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन‎ कार्यक्रमात पगडाल बोलत होते.‎ अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर‎ तांबे होते. जिल्हा बँकेचे संचालक मधुकर‎ नवले, कांचन थोरात, दुर्गा तांबे,‎ रणजीतसिंह देशमुख, कारखान्याचे अध्यक्ष‎ प्रतापराव ओहोळ, अरुण कडू, उद्योजक‎ राजेश मालपाणी, भाऊसाहेब कुटे, सुधाकर‎ जोशी, शंकरराव खेमनर, रामहरी कातोरे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नवनाथ अरगडे, कार्यकारी संचालक‎ जगन्नाथ घुगरकर व संस्थांचे पदाधिकारी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उपस्थित होते.‎

प्रा. पगडाल म्हणाले, भाऊसाहेब थोरात‎ यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी दंडकारण्य‎ अभियानाची चळवळ दिली. त्यांचे जीवन‎ संघर्षमय राहिले. संगमनेर-अकोले‎ तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष‎ केला. त्यामुळे ३० टक्के हक्काचे पाणी‎ मिळाले. सहकारातून समृद्ध झालेला‎ संगमनेर जिल्ह्यातील एकमेव तालुका आहे.‎ निळवंडेचे पाणी दुष्काळी भागातील‎ शेतकऱ्यांच्या शेतात जाईल, तेव्हा त्यांचे‎ स्वप्न पूर्ण होईल.

विखे थोरात यांच्या‎ संघर्षाचे विश्लेषण करताना ते म्हणाले,‎ प्रवरेचे पाणी उचलण्याचा आपल्याला‎ अधिकार नव्हता संघर्ष करून‎ भाऊसाहेब थोरातांनी हा अधिकार‎ मिळवला त्यामुळे हा संघर्ष वाढला .‎‎ नवले म्हणाले, भाऊसाहेब थोरात यांनी‎ पाण्यासाठी संघर्ष केला. मीटर हटाव‎ चळवळ राबवली. सहकाराबरोबर शिक्षण‎ आणि दुग्ध व्यवसायी जोड देता संगमनेर‎ तालुका समृद्ध बनवला. एकही काम‎ अर्ध्यावर सोडले नाही. वयाच्या उत्तरार्धात‎ दंडकारण्य ही अभिनव योजना देशाला‎ दिली. अनेक संकटे आली तरी त्यांनी‎ विचार सोडला नाही. प्रास्ताविक‎ प्रतापराव ओहोळ यांनी, सूत्रसंचालन‎ नामदेव कहांडळ यांनी, तर रणजीतसिंह‎ देशमुख यांनी मानले.‎

देशासाठी विकासाचे मॉडेल‎
माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, सहकार‎ महर्षी थोरात यांनी समाजचिंतन, दूरदृष्टी‎ व समाजाच्या तळमळीतून तालुक्यात‎ विकासाचा पाया घातला. आमदार‎ बाळासाहेब थोरात यांच्या‎ मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका‎ देशासाठी विकासाचे मॉडेल ठरला.‎

स्व. थोरात यांचे स्मारक उभारा‎
नव्या पिढीला भाऊसाहेब थोरात यांचे‎ कार्य माहिती व्हावे, त्यापासून प्रेरणा‎ मिळावी, यासाठी कारखाना‎ कार्यस्थळावर स्व. भाऊसाहेब थोरात‎ यांचे भव्य स्मारक उभारण्याचे आवाहन‎ तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजीत‎ देशमुख यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...