आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने तपोवन रोड येथील मतीमंद मुलांच्या निवासी शाळेत अन्न-धान्याची मदत करण्यात आली. तर मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. प्रगतशील शेतकरी शंकर भाऊ वाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी संतोष वाणी, गणेश वाणी, धनंजय तागड, कुंडलिक ढवण, प्रशांत शिंदे, अमर निक्रड, चैतन्य वाणी, ओम वाणी, तेजश्री निक्रड, गायत्री वाणी, पूजा वाणी आदींसह वाणी परिवारातील सदस्य व शंभूराजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. संतोष वाणी म्हणाले, प्रत्येकाने सामाजिक जाणीव ठेऊन योगदान देण्याची गरज आहे. दीनदुबळ्यांना आधार दिल्यास समाजातील प्रश्न सुटण्यास मदत होईल.
वडिलांनी देखील गरजूंना मदत करण्याची नेहमीच शिकवण दिली. खऱ्या गरजूंना मदत मिळाल्यास ती मदत सार्थकी लागते. ही जाणीव ठेऊन हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश वाणी म्हणाले, वाढदिवस, सण, उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रमांना सामाजिक उपक्रमाची जोड दिल्यास वंचितांना आधार मिळेल. वडिलांच्या विचारांचा वारसा वाणी परिवार व शंभूराजे प्रतिष्ठान सामाजिक योगदानाने चालवत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.