आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा सप्ताह:कुशल कामगारांनी सुरक्षित अन्‎ आरोग्य सांभाळून यश मिळवावे‎

नगर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरक्षितता ही प्रत्येकाच्या जीवनात‎ अविभाज्य घटक आहे. सुरक्षित राहून‎ आपले काम निष्ठेने करणे आवश्यक‎ आहे. सर्व कुशल कामगारांनी सुरक्षित‎ राहून स्वतःचे आरोग्य सांभळून यश‎ प्राप्त करावे. औद्योगिक क्षेत्रातील‎ कामगारांविषयी माझ्या मनात‎ असलेल्या आत्मीयतेने मी वयाच्या‎ नव्वदीतही येथे आलो. मी मनाने‎ अजून तरुण आहे. तुम्हीही कायम मन‎ टाटावात व आनंदी ठेवा. पण जेव्हा‎ आपण सुरक्षित राहू तेव्हाच आनंदी‎ राहू शकतो. यासाठी कायम नियमांचे‎ पालन करून सुरक्षित रहा. मनाला‎ आनंदी, सशक्त व सुदृढ ठेवण्यासाठी‎ रोज केवळ १८ वेळा श्वास मोजून‎ छोटेसे ध्यान करा, असे आवाहन‎ पद्मश्री डॉ.प्रभाकर मांडे यांनी केले.‎ औद्योगिक सुरक्षा व आरोग्य‎ संचालनालय अहमदनगर विभागाच्या‎ वतीने ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह‎ निमित्त गुरुवारी सकाळी नगर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ एमआयडीसी मधील विविध‎ कंपन्यांच्या कामगार, अधिकाऱ्यांची‎ पायी सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात‎ आले होते.‎

रॅलीचा शुभारंभ पद्मश्री डॉ. मांडे व‎ पद्मश्री पोपटराव पवार यांनी झेंडा‎ दाखवून केला. यावेळी औद्योगिक‎ सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे‎ उपसंचालक स्वप्नील‎ देशमुख,एमआयडीसी पोलिस‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र सानप आदी‎ व्यासपीठावर उपस्थित होते. सुरक्षा‎ रॅलीत नगर जिल्ह्यातील विविध‎ कारखान्याच्या तीन हजार कामगारांनी‎ सहभाग घेतला. या सुरक्षा रॅलीने‎ एमआयडीसी मधील प्रमुख‎ रस्त्यांवरून सुमारे सात किलोमीटर‎ फिरून जनजागृती केली.‎ प्रास्ताविक स्वप्नील देशमुख यांनी‎ केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरक्षा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पोवाडा, सुरक्षा गीत, तसेच सन फार्मा‎ कंपनीच्या कामगारांनी सादर केलेल्या‎ सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देणाऱ्या लघु‎ नाटिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या‎ सुरक्षा रॅलीमध्ये एक्साइड इंडस्ट्रीज,‎ स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट‎ लिमिटेड, आयएसएमटी लिमिटेड,‎ सन फार्मासिटिकल या कंपन्यांचे‎ सुरक्षा विषयी जनजागृती करणारे‎ चित्ररथ लक्षवेधी ठरले.‎

नगरमध्ये कामगार साहित्य‎ संमेलन आयोजित करावे‎

या रॅलीमुळे जिल्ह्यातील कामगार,‎ अधिकारी व मालक वर्ग एकत्र येत‎ असल्याने सकारात्मक वातावरण निर्माण‎ होत आहे. स्वप्नील देशमुखांनी आता‎ नगरमध्येच राहून सुरक्षिततेसाठी अधिक‎ काम करावे. नगरमधील औद्योगिक क्षेत्रात‎ अजून चांगले वातावरण निर्माण‎ होण्यासाठी कामगार साहित्य संमेलन‎ नगरमध्ये आयोजित करावे, असे आवाहन‎ पद्मश्री पवार यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...