आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजूनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता. १४) राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथे आंदोलन करणाऱ्या सरकारी, निमसरकारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भेट घेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी या संपास पाठिंबा दिला.
राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद व अन्य कर्मचाऱ्यांनाही जूनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी तांबे यांनी केली. राष्ट्रीय पेन्शन स्कीम (एनपीएस) रद्द करुन जूनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करण्याची सरकारी कर्मचारी व शिक्षकांची मागणी आहे. त्यासाठी हे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.
२००५ पासून सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. सध्या महापालिका, नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे वेतन आयोग, नियमित वेतन आणि पेन्शन वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचारी ज्याप्रमाणे कोषागारातून वेतन, पेन्शन घेतात, ती पद्धती लागू व्हावी, आदी मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. डॉ. तांबे म्हणाले, “सरकारने आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. या सर्व बाबी शासनाच्या हातात असून, यासाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद व इतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे. मी तीन टर्म आमदार होतो. अनेकदा विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. हरियाणा, झारखंड, राजस्थान सरकारने जूनी पेन्शन योजना लागू केली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक कमिटी स्थापन करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.”
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.