आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:सुवेंद्र गांधी यांनी अर्बन बँक‎ बुडवण्याचे श्रेयही घ्यावे‎; नगरसेवक विपूल शेटीया यांचे प्रत्युत्तर‎

अहमदनगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर‎ शहराचे आमदार संग्राम जगताप‎ यांच्या विकास कामाचा धसका‎ घेऊन शहरातील काही लोकांना‎ सध्या आमदार संग्राम जगताप‎ यांच्यावर टीका करणे, एवढाच उद्योग‎ राहिला आहे. स्वत:चे राजकीय‎ अस्तित्व संपण्याच्या स्थितीत‎ असलेली ही मंडळी‎ महानगरपालिकेच्या निवडणुकीत‎ निवडून येऊ शकत नाही.

सुवेंद्र गांधी‎ यांनी पालिकेच्या जागेत त्यांच्या‎ निवासस्थानाचे अतिक्रमण केल्याचे‎ सर्वांना माहिती आहे. अशा व्यक्तीने‎ रस्ते विकासाबद्दल बोलणे‎ हस्यास्पदच आहे, अशा शब्दात‎ नगरसेवक विपुल शेटीया यांनी गांधी‎ यांना प्रत्युत्तर दिले आहे.‎ सीना नदीवर पुलासाठी मंजूर‎ झालेल्या निधीवरून श्रेयवाद रंगला‎ आहे.

सुवेंद्र गांधी यांनी जगताप‎ यांच्यावर टीका केल्यावर‎ राष्ट्रवादीच्या वतीने शेटीया यांनी‎ प्रत्युत्तर देत अर्बन बँक बुडवण्याचे‎ श्रेयही सूवेंद्र गांधी यांनी घ्यावे, असा‎ टोला लगावला आहे. शेटीया यांनी‎ म्हटले की, कल्याण रोड भागातील‎ नागरिकांची होणारी अडचण लक्षात‎ घेऊन तेथील सीना नदीवर उड्डाणपुल‎ होणे ही खूप महत्त्वाची गरज होती.‎

आमदार जगताप यांनी सर्व पातळीवर‎ सातत्याने पाठपुरावा करून या‎ पुलाकरिता सुमारे २४ कोटी मंजूर‎ करुन आणले. २४ मार्च २०२३‎ रोजीच्या मंजूर कामाशी स्व. खा.‎ दिलीप गांधी यांचा संबंध कसा‎ जोडला जाऊ शकतो, याचा अभ्यास‎ आपण करावा. आमदार जगताप‎ यांनी विविध पातळीवर केलेल्या‎ पाठपुराव्याची सर्व स्तरावर नोंद आहे.‎

या ला मंजुरी मिळाल्याने आमदार‎ जगताप यांच्यावर अभिनंदनाचा‎ वर्षाव झाल्याने काहीना पोटदुखी‎ झाली. यातूनच सुवेंद्र गांधी यांनी‎ जगताप यांच्यावर हास्यास्पद टीका‎ केली आहे. शहराचे भूषण‎ असलेली नगर अर्बन बँक बंद‎ पाडण्याच्या उंबरठ्यावर आणून‎ ठेवल्याचे पाप केले. बँकेतील‎ गोर-गरीब ठेवीदारांचे कष्टाचे पैसे‎ परत करा, नंतरच इतर गोष्टीमध्ये‎ नाक खुपसावे, असा खोचक‎ सल्लाही शेटीया यांनी दिला आहे.‎