आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन‎:द्वेषाच्या भिंती जमीनदोस्त‎ करुन प्रेमाचे पूल उभारावे‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवाने आपल्या मनातील द्वेषाच्या‎ भिंती जमीनदोस्त करुन प्रेमाचे पूल‎ उभारावेत. या जगात आपण मानव‎ म्हणून जन्माला आलो आहोत, तर‎ उदात्त मानवी मूल्ये व दिव्य गुणांनी‎ युक्त जीवन जगायला हवे, असे‎ प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता‎ सुदीक्षाजी महाराज यांनी‎ महाराष्ट्राच्या ५६ व्या वार्षिक निरंकारी‎ संत समागमात केले.‎ औरंगाबादच्या बिडकीन‎ डीएमआयसी परिसरात सुमारे ३००‎ एकरावर तीन दिवसीय विशाल‎ निरंकारी संत समागम नुकताच पार‎ पडला. नगरसह महाराष्ट्राच्या‎ कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून‎ लाखोंच्या संख्येने जनसागर येथे‎ लोटला होता.

या तीन दिवसीय‎ समागमाचा प्रारंभ शोभायात्रेने झाला.‎ त्यात बंजारा नृत्य, कोळी नृत्य,‎ तारणा नृत्य, आदिवासी नृत्य,‎ दिंडी-वारकरी, ढोल पथक आदींचा‎ समावेश होता. भक्तांनी समागमाचा‎ मुख्य विषय ‘आत्मिकता व मानवता‎ संगे संगे’ या विषयावर विचार, गीत,‎ भजन, कवितांच्या माध्यमातून‎ प्रकाश टाकला.‎ समागमाच्या दुसर्‍या दिवशी‎ सकाळच्या सत्रात प्रभावशाली‎ सेवादल रॅली पार पडली. या रॅलीत‎ सेवादलाद्वारे लघुनाटिका, विविध‎ खेळ, शारीरिक कवायती, योगा व‎ मल्लखांब आदी प्रकार सादर केले.‎ दुपारी सत्संगाच्या खुल्या सत्रात‎ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी‎ सदिच्छा भेट दिली.

कायरो प्रॅक्टीस‎ उपचार पद्धतीद्वारे विदेशी डॉक्टरांच्या‎ पथकाने रुग्णांच्या पाठीच्या‎ मणक्यावर विशिष्ट उपचार केले.‎ त्याचा सहा हजारांहून अधिक‎ गरजूंनी लाभ घेतला. समागम स्थळी‎ डिस्पेंसरी, प्रकाशन स्टॉल लावले‎ होते. भाविकांसाठी २४ तास लंगर‎ सेवा सुरु होती. भाविकांची‎ राहण्याची व्यवस्था प्रशस्त तंबूमध्ये‎ केली होती. त्यांच्यासाठी वीज, पाणी,‎ स्वच्छतागृह आदीची सुंदर व्यवस्था‎ केली होती.‎

बातम्या आणखी आहेत...