आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण ‎:सकारात्मक बदलासाठी महाराष्ट्रातही‎ तेलंगणाचा "केसीआर पॅटर्न'' आवश्यक‎

विजय पोखरकर | अकोले‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रापेक्षा तेलंगण राज्य छोटे व‎ नव्याने निर्मित असूनही तेथे शिक्षण,‎ आरोग्य, कृषी, उद्योग, व्यापार आदींसह‎ विविध क्षेत्रातील विकास केवळ नजरेत‎ भरणाराच नव्हे, तर तो देशात‎ उल्लेखनीय आहे. दरवर्षी पेरणी‎ हंगामपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात‎ न मागताच १० हजारांचे अनुदान जमा‎ करण्यात येते. शेतीस वीज व पाणी‎ मोफत उपलब्ध आहे. रस्ते दर्जेदार व‎ विकास कामे उल्लेखनीय आहेत.‎ उद्योजक, शेतमजूर, कष्टकरी व‎ शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना‎ तेलंगणा राज्यातील केसीआर पेटर्नस्‎ प्रशासन कामकाज समाधानकारक‎ वाटते.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर‎ तथा के. चंद्रशेखर राव यांच्याप्रमाणे‎ दूरदृष्टी अन्य राज्यात का नाही? हे‎ महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क होत‎ नांदेड येथील जाहीर सभेतून समजावून‎ घेऊन महाराष्ट्रात केसीआर पॅटर्न‎ राज्यभर राबवण्याची गरज आहे, असे‎ आवाहन भारत राष्ट्र समितीचे‎ पदाधिकारी दशरथ सावंत व निवृत्त‎ शासकीय अधिकारी बी. जे. देशमुख‎ यांनी केले.‎

अकोल्यात सार्वजनिक बांधकाम‎ विभाग विश्रामगृहावर आयोजित पत्रकार‎ परिषदेत भारत राष्ट्र समितीत सामिल‎ सावंत व देशमुख बोलत होते. पत्रकार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ परिषदेस सोमनाथ थोरात, भानुदास‎ देशमुख, अशोक धुमाळ, संदीप शेणकर‎ आदींसह शेतकरी उपस्थित होते. ते पुढे‎ म्हणाले, इथल्या राज्यकर्त्यांना‎ तेलंगणाच्या विकासाभिमुख‎ ध्येयधोरणानुसार काम करणे शक्य का‎ होत नाही? तर अशुद्ध हेतू व स्वार्थी‎ विचाराबरोबरच जनतेच्या भावनाशी‎ खेळत सत्ता काबीज करण्याचे ते कधी‎ थांबवणार नाही. म्हणूनच महाराष्ट्रात‎ सकारात्मक बदलासाठी तेलंगणाचे‎ मुख्यमंत्री केसीआर यांचे नेतृत्व हवे.‎ त्यासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा शेजारील‎ ७ राज्यातून भारत राष्ट्र समितीचे कार्यास‎ सुरुवात झाली.

या दृष्टीने भारत राष्ट्र‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ समितीत सुमारे एक हजार‎ पदाधिकाऱ्यांकडून महाराष्ट्रात २२४‎ मतदारसंघात प्रचार व प्रसार करण्याचे‎ नियोजन आहे. याची सुरुवात ५‎ फेब्रुवारीपासून नांदेड येथून जाहीर सभेने‎ करण्यात येत आहे, अशी माहिती दशरथ‎ सावंत, देशमुख यांनी दिली.‎ सावंत व देशमुख म्हणाले, शासनाच्या‎ सहभागाशिवाय शेती व शेतकरी‎ ऊर्जितावस्थेत आणण्याचे प्रयत्न निष्फळ‎ आहेत.

तेलंगण शेतकऱ्यांचा केसीआर‎ यांच्यावरील विश्वास व शेतकऱ्यांना‎ मिळणारे लाभ पाहता उशिराने का होईना.‎ पण आमच्याही ते लक्षात आले.‎ केसीआर यांच्या कार्यपद्धतीवर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महाराष्ट्राचा विकास झाल्यास‎ शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक सुखी‎ करण्याचे प्रयत्न अधिक सुकर व‎ गतिमान होतील. आपण स्वातंत्र्याचा‎ अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत.‎ पण तेलंगणात मुख्यमंत्री केसीआर जे‎ अल्पावधीत तेथे करू शकले ते‎ महाराष्ट्रासह अन्य राज्यातील नामवंत‎ कृषीतज्ञ, राजकीय नेते, विचारवंत ७५‎ वर्षांत करू शकले नाहीत, ही शोकांतिका‎ आहे. यामुळेच यापुढील काळात तरी‎ केसीआर यांच्या शिवाय महाराष्ट्राची‎ सर्वांगीण प्रगती वेगवान होईल, असे‎ सुतराम वाटत नाही, असेही त्यांनी‎ पत्रकार परिषदेत सांगितले.‎

नांदेड येथे ५ फेब्रुवारीला‎ केसीआर यांची जाहीर सभा‎ केसीआर यांच्या तेलंगण राज्यातील कृषी‎ पॅटर्नची देशाला गरज आहे. हा केसीआर‎ पॅटर्न समजून घेण्यासाठी नांदेड येथे ५‎ फेब्रुवारी रोजी जाहीर सभेचे आयोजन‎ करण्यात आले. राज्यातील कामगार,‎ शेतमजूर, व्यावसायिक, नोकरदार,‎ शेतकऱ्यांसह सर्व क्षेत्रातील जाणकार व‎ नागरिकांनी या सभेस उपस्थित राहून‎ सर्वांगीण विकासाचा केसीआर पॅटर्न‎ महाराष्ट्रात राबवण्यास आपले समर्थन‎ द्यावे, असे आवाहन शेतकरी नेते दशरथ‎ सावंत, बी. जे. देशमुख व सोमनाथ‎ थोरात यांनी केले.‎

नांदेड येथे ५ फेब्रुवारीला‎ केसीआर यांची जाहीर सभा‎ केसीआर यांच्या तेलंगण राज्यातील कृषी‎ पॅटर्नची देशाला गरज आहे. हा केसीआर‎ पॅटर्न समजून घेण्यासाठी नांदेड येथे ५‎ फेब्रुवारी रोजी जाहीर सभेचे आयोजन‎ करण्यात आले. राज्यातील कामगार,‎ शेतमजूर, व्यावसायिक, नोकरदार,‎ शेतकऱ्यांसह सर्व क्षेत्रातील जाणकार व‎ नागरिकांनी या सभेस उपस्थित राहून‎ सर्वांगीण विकासाचा केसीआर पॅटर्न‎ महाराष्ट्रात राबवण्यास आपले समर्थन‎ द्यावे, असे आवाहन शेतकरी नेते दशरथ‎ सावंत, बी. जे. देशमुख व सोमनाथ‎ थोरात यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...