आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:कृषी आभियांत्रिकी शाखेच्या‎ विद्यार्थ्यांचे थाळीनाद आंदोलन‎

राहुरी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी‎ सेवा परीक्षेतील केलेल्या बदलांमुळे‎ कृषी अभियंत्याच्या ताटातील घास‎ काढून घेतल्याचा आरोप करत‎ महात्मा फुले कृषी विद्यापीठातील‎ आभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी‎ सोमवारी आंदोलनाच्या तेराव्या‎ दिवशी रिकाम्या थाळ्या वाजवून‎ आम्हाला न्याय मिळावा, अशी‎ मागणी केली.‎ लोकसेवा आयोगाने कृषी‎ आभियांत्रिकी शाखेतील विषय हा‎ कृषी महाविद्यालय‎ अभ्यासक्रमातील घेतलेला आहे.‎ दरम्यान, पदवी स्वतंत्र असल्याने‎ कृषी स्पर्धा परीक्षेमध्ये कृषी‎ आभियांत्रिकी पदवीचा‎ अभ्यासक्रमात समावेश करावा,‎ अशी मागणी या शाखेतील‎ विद्यार्थ्यांकडून झाल्याने लोकसेवा‎ आयोग विरुद्ध आभियांत्रिकी‎ विद्यार्थी या वादाला तोंड फुटले‎ आहे.

अापल्या मागणीसाठी राहुरी‎ कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय‎ इमारतीसमोर आभियांत्रिकी‎ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.‎ सोमवारी आंदोलनाचा तेरावा दिवस‎ असताना अद्याप कुठलाही तोडगा‎ निघू शकलेला नाही. आंदोलन‎ दरम्यान काही विद्यार्थ्यांची प्रकृती‎ खालावली आहे. सोमवारी‎ लोकसेवा आयोग व शासनाचे लक्ष‎ वेधण्यासाठी आभियांत्रिकी‎ शाखेतील विद्यार्थ्यांनी थाळीनाद‎ करून कृषी विद्यापीठाचा परिसर‎ दुमदुमून टाकला. आभियांत्रिकी‎ विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की,‎ लोकसेवा आयोगाकडून आमच्या‎ ताटातील घास हिरावून घेतला,‎ अशी एक भावना व्यक्त केली.‎

बातम्या आणखी आहेत...