आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीप्रश्न:शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी‎ मार्गी लागणार : आमदार जगताप‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराची वाढती लोकसंख्या आणि‎ त्या तुलनेत उपलब्ध होणारे कमी‎ पाणी यामुळे पिण्याच्या पाण्याचा‎ तुटवडा जाण वत आहे. या दृष्टीने‎ भविष्याची गरज लक्षात घेऊन नगर‎ शहराला पन्नास वर्षांनंतर अमृत‎ पाणी योजनेचे काम हाती घेण्यात‎ आले. या योजनेचे काम आता पूर्ण‎ झाले. नगर शहराला मुबलक ११८‎ लाख लिटर पाण्याचा साठा उपलब्ध‎ होणार आहे. त्यामुळे नगर शहराचा‎ कायमस्वरुपीचा पाणी प्रश्न मार्गी‎ लागणार आहे, असे प्रतिपादन‎ आमदार संग्राम जगताप यांनी केले.‎ वसंत टेकडी येथील जुन्या ६८‎ लाख लिटर पाण्याची टाकी‎ कार्यान्वित करून पाणीपुरवठा‎ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते‎ शुभारंभ करण्यात आला.

यावेळी‎ आयुक्त डॉ.पंकज जावळे,‎ उपमहापौर गणेश भोसले, मनपा‎ विरोधी पक्षनेते संपत बारस्कर,‎ स्थायी समिती सभापती कुमारसिंह‎ वाकळे, नगरसेवक अविनाश घुले,‎ नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे,‎ नगरसेवक डॉ.सागर बोरुडे,‎ नगरसेवक सुनील त्र्यंबके,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नगरसेविका दिपाली बारस्कर,‎ नगरसेवक समद खान, नगरसेवक‎ प्रकाश भागानगरे, नगरसेवक‎ निखिल वारे, बाळासाहेब पवार,‎ बाळासाहेब बारस्कर, शिवाजी‎ चव्हाण, अमोल गाडे, तायगा शिंदे,‎ नगरसेवक मनोज दुल्लम, बाबा‎ खान, भा कुरैशी उपस्थित होते.‎

आमदार जगताप म्हणाले, नगर‎ शहराला वसंत टेकडी येथील जुनी‎ ६८ लाख लिटर पाण्याच्या टाकीतून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाणीपुरवठा होत होता. अनेक‎ वर्षाची ही टाकी असल्यामुळे तिची‎ गळती सुरू झाली होती. दुरुस्तीचे‎ काम हाती घेऊन ते काम पूर्ण होऊन‎ आज या टाकीमध्ये पाणीपुरवठा‎ करून कार्यान्वित केली आहे.‎ त्यामुळे शहराला ६८ लाख लिटर‎ पाण्याची टाकी व ५० लाख लिटर‎ पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा‎ केला जाणार आहे. त्यामुळे‎ शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागेल.‎

नगरकरांना पूर्ण दाबाने पाणी मिळेल‎ मुळा धरणातून अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. विळद पंपिंग स्टेशन येथे‎ पाण्याची मोटर बसवण्याचे काम लवकरच पूर्ण होऊन अमृत पाणी योजनेचे पाणी‎ वसंत टेकडी येथे पडणार आहे. त्यामुळे सुमारे ११८ लाख लिटर पाणी नगरकरांना‎ प्रतिदिन मिळणार आहे. नगर शहराचा अनेक वर्षांचा प्रलंबित पाणी प्रश्न मार्गी‎ लागून पूर्ण दाबाने नगरकरांना पाणी मिळेल, असे आमदार जगताप म्हणाले.‎

नगरकरांना पूर्ण दाबाने पाणी मिळेल‎ मुळा धरणातून अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. विळद पंपिंग स्टेशन येथे‎ पाण्याची मोटर बसवण्याचे काम लवकरच पूर्ण होऊन अमृत पाणी योजनेचे पाणी‎ वसंत टेकडी येथे पडणार आहे. त्यामुळे सुमारे ११८ लाख लिटर पाणी नगरकरांना‎ प्रतिदिन मिळणार आहे. नगर शहराचा अनेक वर्षांचा प्रलंबित पाणी प्रश्न मार्गी‎ लागून पूर्ण दाबाने नगरकरांना पाणी मिळेल, असे आमदार जगताप म्हणाले.‎

बातम्या आणखी आहेत...