आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुका लग्न ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे.आजमितीला लाखो तरुण लग्नाच्या उंबरठ्यावर असून अनेकांची वय उलटून गेली आहेत. मुलींची स्थळे दाखवतो म्हणून अनेक बोगस वधू वर सूचक मंडळे, अनेक एजंट या तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना राजरोस फसवत आहेत. फसवणूक होऊनही इज्जतीचा पंचनामा नको म्हणून पीडित कुटुंबीय गप्प राहत असल्याने या एजंटांचे प्रस्थ मात्र वाढत चालले आहे. गावोगावी शेकडो, हजारो तरुण अविवाहित स्थितीत आहेत. पूर्वी मुलीला हुंडा द्यावा लागत होता पण आता परिस्थिती बदलली आहे. फक्त मुलगी द्या आम्ही सर्व करून घेतो, असे म्हणूनही लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या आहेत. त्यातच मुली आणि त्यांचे पालक यांच्या अपेक्षा वाढल्याचेही दिसून येत आहे.
नोकरीच हवी, बरोबर फ्लॅट, बंगला गाडी, जमीन या अपेक्षामुळे अनेक मुली लग्नाचे वय ओलांडून पुढे जात आहेत. नोकरी नसल्याने अनेक तरुण व्यवसाय किंवा शेती करत आहेत त्यांची अवस्था तर बिकट आहे. परिणामी लाखो तरुण लग्नाचे स्वप्न पाहून अविवाहित आहेत आणि याचाच गैरफायदा समाजातील काही लोक घेत आहेत. आजमितीला समाजात अनेक बोगस वधू वर सूचक मंडळे निर्माण झाली आहेत. सोशल मीडियावर आलेल्या इच्छुक वराच्या बायोडाटा वरील फोन नंबरवर हे लोक फोन करतात.
सुंदर मुलींचे फोटो पाठवून तुम्हाला योग्य स्थळ देतो पाच हजार, दहा हजार ऑनलाइन भरण्यास सांगितले जाते. सुरुवातीला मुलींचे फोटो, संपर्क नंबर नसलेल्या खोट्या बायोडाटा सह माहिती पाठवली जाते. पैसे मिळाले की तो क्रमांक बंद होतो. तसेच काही एजंट २ लाख,तीन लाख कमिशन घेऊन लग्न लावून देतात. लग्न झाल्यानंतर २ ते ३ दिवसांत नवरी घरातील दागदागिने घेऊन पसार झालेली असते. अशा घटना गावोगावी घडत आहेत. फसवणूक होऊनही लग्नाळू तरुण आणि त्यांचे कुटुंबीय वाश्चता नको, इज्जतीचा पंचनामा नको म्हणून चूप राहणेच पसंत करत आहेत. फसवणूक करूनही कोठे तक्रार किंवा वाच्यता होत नसल्याने या ठगांची दुकानदारी राजरोस सुरू आहे. यामुळे मात्र प्रामाणिकपणे वधू वर सूचक मंडळे किंवा सामाजिक कार्य मोफत करणाऱ्या लोकांकडेही लोक आता संशयाने पहात आहेत.
फसवणूक झाली पण सांगू कसं माझ्या मुलाचा बायो डाटा एका ग्रुपवर टाकला होता. मला पुण्याच्या वधू वर सूचक मंडळामधून फोन आला. सुरुवातीला काही चांगल्या मुलींचे बायो डाटा मला पाठवण्यात आले त्यावर पत्ता,फोन नंबर नव्हते. जर संपर्क करायचा असेल तर पाच हजार ऑनलाइन पाठवा असे सांगितले. मी पैसे पाठवले आणि आता तो फोन नंबर बंद लागत आहे, असे एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
विचार करून विश्वास ठेवा व्यावसायिक, शेतकरी मुले श्रीमंत असतात, स्वतः मालक असतात. मग मालक व्हायचे की नोकर याचा मुली आणि पालकांनी विचार केला पाहिजे. कोरोना काळात आणि आर्थिक मंदीत अनेक नोकरदार घरी आले आहेत. सर्वच नोकऱ्या आता अशाश्वत झालेल्या आहेत. याचाही विचार व्हावा. मुलाच्या पालकांनीही फसवणूक टाळण्यासाठी नाते गोते, ओळखीचे लोक, आणि ओळखीच्या संस्थांवरच विश्वास ठेवला पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.