आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर शहराजवळील तपोवन रोडसह 44 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बुऱ्हाणनगर पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी सोमवारी, 13 जूनला सकाळी पुन्हा फुटली. त्यामुळे पुढचे काही दिवस या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, 1 जूनला पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनला तडे गेल्याने ती नादुरुस्त झाली होती. त्यामुळे सात दिवस पाणी पुरवठा बंद होता.
44 गावांना पाणीपुरवठा
राहुरी तालुक्यातील मुळा धरणातून बुऱ्हाणनगर पाणीपुरवठा योजनेतून तपोवनसह 44 गावांना पाणीपुरवठा केला जातो. 1 जूनपासून नादुरुस्तीमुळे पाणी योजनेचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे तपोवन रोड व तपोवन नगर शिवाजीनगर, संत वामनभाऊ नगर,साईनगर, गजराज नगर, सह अन्य भागातील पाणीपुरवठा गेल्या सात दिवस बंद होता. त्यामुळे नागरिकांना टँकरची विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागली होती.
विळत घाटात फुटली
अहमदनगर - मनमाड रोडवरील विळद घाटात सोमवारी सकाळी बुऱ्हाणनगर पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली आहे. मुळा धरणातून वेळेत घाटामार्गे या योजनेची जलवाहिनी येते. या भागात रात्री झालेल्या पावसामुळे ही जलवाहिनी फुटली असावी, असा अंदाज बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे. दरम्यान अद्याप ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.