आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२१६ मीडियम रेजिमेंट स्थापना दिन ‎:लष्करात मराठा बटालियनला मोठी गौरवशाली परंपरा‎

नगर‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सैन्य दलात मराठा‎ बटालियनची गौरवशाली परंपरा‎ आहे. १९७१ साली झालेल्या‎ भारत-पाक युद्धात २१६ मीडियम‎ रेजिमेंटच्या सैनिकांनी अभूतपूर्व‎ पराक्रम केला होता. देशसेवेच्या‎ कार्यात सैनिकांचे मोठे योगदान‎ असल्याचे सांगताना, जिल्हा‎ पोलीस अधीक्षक राकेश ओला‎ यांनी २१६ मीडियम रेजिमेंटच्या‎ स्थापना दिनानिमित्त सर्व‎ आजी-माजी सैनिकांना शुभेच्छा‎ दिल्या.‎ शहरातील हॉटेल संजोग येथे‎ नगर जिल्ह्यातील आजी-माजी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सैनिकांचा मेळावा व २१६ मीडियम‎ रेजिमेंटचा स्थापना दिवस मोठ्या‎ उत्साहाने साजरा करण्यात आला.‎ त्यावेळी अधीक्षक राकेश ओला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बोलत होते. कर्नल व्ही. डी. पोट्टी,‎ कर्नल वेणुगोपाल, कर्नल डॉ. मोहन‎ रोटे, व्ही. के. शर्मा, कॅप्टन के. एन.‎ गिरी, सुभेदार मेजर एन. के. पाटील,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ एन. के. पाटील, सुभेदार मेजर के‌.‎ व्ही. भोसले, कॅप्टन गंगाधर चेमटे,‎ शिवाजी गिरवले आदी उपस्थित‎ होते.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सुरुवातीला छत्रपती शिवाजी‎ महाराजांना पुष्पहार अर्पण करून‎ अभिवादन करण्यात आले.‎

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने‎ करण्यात आली. या कार्यक्रमात‎ वीरमाता, वीरपत्नींचा सत्कार‎ करण्यात आला. या कार्यक्रमात‎ संपूर्ण महाराष्ट्रातील आजी-माजी‎ सैनिकांचा उस्फूर्त सहभाग होता.‎ देशभक्तीपर गीतांनी वातावरण‎ देशभक्तीमय झाले होते.‎ कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा‎ आजी माजी सैनिक संघटना,‎ ऑडनरी गंगाधर चेमटे, शिवाजी‎ गिरवले, घन:शाम खराडे, आदिनाथ‎ फासले, भरत खाकाळ, राजेंद्र‎ जगताप, नंदकुमार साठे, सुनील‎ तारडे, दुर्योधन जाधव, दिनकर गर्जे,‎ अशोक कार्ले आदींसह‎ आजी-माजी सैनिकांनी परिश्रम‎ घेतले.‎

आता परिवाराला‎ वेळ द्या : पोट्टी‎ सेवानिवृत्त सैनिकांनी आपल्या‎ परिवारासाठी वेळ द्यावा. सैन्य‎ दलात सेवेत असताना,‎ परिवाराला वेळ देता आला नाही.‎ ज्या ठिकाणी नोकरी करीत‎ आहात, तेथे देशाच्या गौरवासाठी‎ कार्य करा व जीवनात यशस्वी‎ होण्याचे आवाहन कर्नल व्ही. डी‌.‎पोट्टी यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...