आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन‎:कुटुंबाचे पावित्र्य प्रत्येक‎ घटकावर अवलंबून

श्रीरामपूर‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकत्र कुटुंब पद्धतीमुळे भारतीय‎ संस्कृती जगात श्रेष्ठ मानली जाते.‎ कुटुंबातील पावित्र्य प्रत्येक घटकावर‎ अवलंबून असते. आपापसातील‎ प्रेम, सामंजस्य, आपुलकी, सहकार्य‎ यामुळे कुटुंब व्यवस्था सुरळीत‎ चालते. कुटुंबामध्ये प्रत्येक घटक‎ एकमेकांवर अवलंबून असतो‎ तथापि सासू आणि सून हे नाजूक‎ नाते असते. कुटुंबांमध्ये सासू आणि‎ सुनेचे संबंध आई-मुलीसारखे‎ असतील.

असेच पावित्र्य सर्व‎ कुटुंबात असले तर कुटुंबामध्ये‎ शांतता नांदेल, असे प्रतिपादन‎ गटशिक्षणाधिकारी साईलता‎ सामलेटी यांनी केले.‎ येथील आगाशे सभागृहामध्ये‎ आयोजित आदर्श सासू-सून‎ पुरस्कार वितरण व तालुक्यातील‎ सदृढ बालक-बालिका स्पर्धेतील‎ विजेत्या बालकांचा बक्षीस वितरण‎ समारंभ सामलेटी यांच्या हस्ते‎ झाला. त्यावेळी त्या बोलत‎ होत्या.यावेळी नगरपालिका‎ वैद्यकीय अधिकारी डॉ. जया‎ छतवाणी-कुकरेजा, पंचायत‎ समिती महिला व बालविकास‎ अधिकारी शोभा शिंदे, सुनील‎ साळवे आदी उपस्थित होते.‎ दरम्यान, राखी सुरडकर,शारदा‎ सुरडकर, मीना माखीजा, हर्षा‎ माखिजा, पूनम होले, मंगल होले,‎ सुरेखा बाहुले, हिराबाई बाहुले,‎ पटेल जुमनबी मैनुद्दीन, पटेल‎ शबनूर साजीद, सीमा केदार, सुमन‎ केदार आदी सासू सुनांचा सन्मान‎ करण्यात आला. प्रास्ताविक सुनील‎ साळवे यांनी, सूत्रसंचालन डॉ.‎ संजय दुशिंग यांनी, तर अाभार‎ प्रवीण साळवे यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...