आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पष्टीकरण‎:काँग्रेसचा विचार, हाच आपला विचार‎

संगमनेर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंतची वाटचाल काँगेसच्या‎ विचाराने केली व यापुढेही याच‎ ‎ विचाराने काम‎ ‎ करू काही‎ ‎ लोकांनी‎ ‎ गैरसमज‎ ‎ पसरून‎ ‎ आपल्याला‎ भारतीय जनता पक्षापर्यंत पोहचवले.‎ एवढेच नाही तर तिकिटाचे वाटपही‎ करून टाकले, असे प्रतिपादन‎ काँगेस नेते, माजी मंत्री आमदार‎ बाळासाहेब थोरात यांनी केले.‎ वाढदिवसानिमित्ताने ''शिंदेशाही‎ बाणा'' या आयोजित कार्यक्रमात‎ जनसमुदायासमोर त्यांनी आजारी‎ अवस्थेत ऑनलाईन संवाद साधला.‎

विधान परिषदेच्या निवडणुकीत‎ चांगल्या मताने विजयी झाल्याबद्दल‎ सत्यजीत तांबे यांचे अभिनंदन‎ करून आमदार थोरात म्हणाले,‎ महाराष्ट्रातील सुसंस्कृत सर्वात‎ विकसनशील मोजक्या‎ तालुक्यामध्ये संगमनेरचा वरचा‎ क्रमांक आहे. सर्वात चांगले‎ राजकारण चांगली संस्कृती आपली‎ आहे, असे जाणकार सांगतात.‎ विधान परिषदेचे निवडणुकीत‎ झालेल्या राजकारणाने आपण‎ व्यतीत झालो असून आपल्या‎ भावना पक्षश्रेष्ठींना कळविल्या‎ आहे.

मात्र हे पक्षीय राजकारण‎ आहे. यावर बाहेर बोलणे उचीत‎ नाही. पक्ष व माझ्या पातळीवर योग्य‎ निर्णय घेऊ, आपण काळजी करू‎ नका. काँगेसचा विचार हाच आपला‎ विचार राहील, याची ग्वाही दिली.‎ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे‎ नाव न घेता टीका करताना म्हणाले,‎ सत्ता बदलानंतर तालुक्यावर सूड‎ उगवावा असे हल्ले होत आहेत.‎ कार्यकर्त्यांना अडचणीत आणून‎ त्यांचे उद्योग व्यवसाय बंद‎ पाडण्याचा प्रयत्न होत आहे.‎ आपल्या विकासाची कामे बंद‎ पाडली जात आहे. आपण सत्ता‎ आणि सत्ता बदल पाहिला आहे.‎ सत्तेत राहीलो आहे.‎ नागपूर येथे सकाळी‎ मॉर्निंगवॉकला जाताना खड्ड्यात पाय‎ सरकल्याने पडलो. तीन ठिकाणी‎ फॅक्चर झाल्याने खांद्यावर‎ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे‎ डॉक्टरानी प्रवास नाकारला.‎ महिनाभर संगमनेरला नाही, असे‎ कधीही झाले नाही. तालुका हे‎ आपले कुटुंब आहे, असे ते म्हणाले.‎

बातम्या आणखी आहेत...