आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडाखा:अवकाळी पावसाने हिरावला‎ हातातोंडाशी आलेला घास‎

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका‎ तालुक्यातील बहुतांशी गावाला‎ मंगळवारच्या अवकाळी वादळी पावसाने‎ तडाखा दिला. यात गहू, मका, कांदा, घास‎ यासारख्या पिकांचे नुकसान झाले. गहू व‎ मका तर आडवे पडले. खडकी परिसरात‎ संत्राबांगाना मोठा फटका बसला आहे.‎ तयार झालेली फळे जोरदार वाऱ्यामुळे‎ गळून पडली असून यामध्ये प्रत्येक‎ शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले‎ आहे. कापूरवाडी परिसरात कांदा पिकांना‎ अवकाळी पावसाचा फटका बसला.‎ हातातोंडाशी आलेला घास हिरावला‎ गेल्याने शेतकरी चिंता ग्रस्त झाला आहे.‎ प्रशासनाने तातडीने पंचनामे करून‎ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत‎ आहे.‎ शेतकऱ्यांना मंगळवारी सकाळी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा‎ फटका बसला. अचानक मेघगर्जनेसह‎ वादळी पावसाला सुरुवात झाली. खडकी,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बाबुर्डी बेंद, खंडाळा, वाळकी,‎ जाधववाडी, सारोळा कासार, भोरवाडी,‎ निमगाव वाघा, येथील संत्रा बागांचे मोठे‎ नुकसान झाले.

संत्राफळे आता तयार‎ झाली असून तोडणीला आले आहेत. पण‎ वादळी पावसात या संत्रा फळांना चांगला‎ फटका बसुन फळे झाडावरून खाली‎ पडली. बागेत गळुन पडलेल्या संत्रा‎ फळांचा खच पडला होता.‎ कापुरवाडी, वारूळवाडी, जेऊर,‎ डोंगरगण, धनगरवाडी, पिंपळगाव‎ माळवी, ससेवाडी भागात गहू, मका,‎ कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले.‎ काढणीला आलेला गहू भुईसपाट झाल्याने‎ शेतकरी काळजीत पडला आहे. निंबळक,‎ वडगाव गुप्ता, हिंगणगाव, चिचोंडी‎ पाटील, रूई छत्तीशी परिसरात गहू, मका,‎ कांदा पिकांचे नुकसान झाले. तसेच‎ भाजीपाला आणि फळभाज्या यांचेही मोठे‎ नुकसान झाले आहे. कमी अधिक‎ प्रमाणात तालुक्यातील बहुतांश भागात‎ नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.‎

पंचनामे करून‎ नुकसान भरपाई द्यावी‎
मी माझी संत्रा फळबाग वर्षभर‎ जपली आहे. बहारापासून आजपर्यंत‎ लाखो रुपयांचा खर्च या बागेवर केला‎ आहे. एप्रिल- मे महिन्यात संत्रा‎ फळांना चांगली मागणी असल्याने‎ चांगले पैसे मिळतील या आशेवर‎ होतो .पण मंगळवारच्या पावसाने‎ बागेतील ७० टक्के फळे गळली.‎ प्रशासनाने पंचनाने करत नुकसान‎ भरपाई द्यावी. -‎ संदीप रघुनाथ कोठुळे, शेतकरी, खडकी‎

बातम्या आणखी आहेत...