आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज‎:श्रीरामपूरसाठी मंजूर 220 केव्ही वीज‎ उपकेंद्राचे काम लवकर सुरू व्हावे‎

श्रीरामपूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सर्व शेतकरी, व्यापारी,‎ औद्योगिक तसेच घरगुती आणि लघु‎ उद्योगातील ग्राहक हे कमी दाबाच्या वीज‎ पुरवठ्याच्या समस्येशी झुंजत आहेत.‎ त्यामुळे तालुक्याला मंजूर झालेले २२०‎ केव्ही वीज उपकेंद्राचे काम लवकर सुरू‎ करण्यात यावे, यासाठी पढेगाव येथील‎ उडान व नेताजी फाउंडेशनच्या वतीने‎ पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना येत्या ४‎ फेब्रुवारी रोजी श्रीरामपुरात हजारो‎ शेतकऱ्यांच्या उपस्थितीत साकडे‎ घालण्यात येणार आहे.‎

याबाबत जितेंद्र तोरणे, रणजित बनकर,‎ प्रवीण लिप्टे आदींसह अनेक‎ पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे, श्रीरामपूर‎ तालुक्यातील जनता या समस्येमुळे खूप‎ खूप त्रस्त आहे. या समस्येतून आपल्या‎ तालुक्यातील सर्व स्तरातील वीज‎ ग्राहकांची कायमस्वरूपी सुटका‎ करण्यासाठी नेताजी फाउंडेशन, उडान‎ फाउंडेशन यांच्या माध्यमातून सतत‎ पाठपुरावा केला आहे.

२०२० मध्ये‎ तालुक्याला २२० केव्ही वीज मंजूर झाले‎ आहे. त्याची उभारणी लवकरात लवकर‎ करून आपल्या तालुक्यातील जनतेची‎ वीज पुरवठा विषयीची गंभीर समस्येचा‎ कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी आम्ही‎ आपल्या तालुक्यातील सर्व शेतकरी,‎ व्यापारी, औद्योगिक आणि घरगुती वीज‎ ग्राहक आणि जनतेला दिलासा मिळणार‎ आहे. शेतीला योग्य दाबाने वीज पुरवठा‎ होईल, रोहित्र व्यवस्थित चालतील,‎ जळण्याचे प्रमाण कमी होईल, वीज‎ पुरवठा वारंवार खंडित होणार नाही, उद्योग‎ सुरळीत सुरू राहतील, घरगुती ग्राहकाना‎ दिलासा मिळेल, एमआयडीसीमध्ये नवीन‎ उद्योग येण्यास पोषक वातावरण तयार‎ होईल, त्यामुळे तालुक्यातील बेरोजगार‎ तरुणांना उद्योग तसेच रोजगार मिळतील,‎ असेही निवेदनात नमूद केले.‎

बातम्या आणखी आहेत...