आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎तक्रारी:जलजीवन मिशन योजनेचे काम‎ ग्रामपंचायत राजकारणातून ठप्प‎

‎कुकाणे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎सौंदाळा येथील तांत्रिकदृष्ट्या‎ परिपूर्ण व योग्य असलेल्या‎ जलजीवन मिशन योजनेचे काम‎ लवकर पूर्ण करावे व विरोध‎ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई‎ करण्याच्या मागणीसाठी‎ नेवासे-शेवगाव मार्गावर दोन तास‎ ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात‎ आले. पुढील ८ महिन्यांवर‎ ग्रामपंचायत निवडणूक आल्याने‎ राजकारण डोळ्यासमोर ठेवून काही‎ विघ्नसंतोषी लोकांनी विकासकामे‎ हाणून पाडण्याकरिता योजनेसाठीची‎ विहिर व टाकीची जागा योग्य‎ नसल्याबाबत तक्रारी केल्या.‎ सौंदाळा गावासाठी जलजीवन‎ मिशन योजना मंजूर झाली असून,‎ त्यासाठी मुळा धरणाच्या उजव्या‎ कालव्याच्या पाण्याचा मुख्य उद्भव‎ आहे.

गावाजवळून जाणारा मुळा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ धरणाचा कालवा उन्हाळ्यात मार्च‎ ते जून महिन्यापर्यंत १०-१५‎ दिवसांच्या अंतराने कायमस्वरूपी‎ दीड-दीड महिन्याचे आवर्तन‎ असते. यामुळे जलजीवन मिशन‎ अंर्तगत पिण्याच्या पाण्याची विहिर‎ घेण्यासाठी कालव्यालगत २ गुंठे‎ जागा बक्षिसपत्र करून घेतली आहे.‎ या विहिरीची जागा कनिष्ठ‎ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि‎ विकास यंत्रणांनी पाहणी करून‎ योग्य असल्याचे प्रमाणपत्र‎ दिल्यानंतरच बक्षिसपत्र करून दिले‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे.‎ सौंदाळा गाव कमी उंचीवर‎ असल्याने गावठाणामध्ये जागा‎ घेतल्यास वाड्या-वस्त्यांवर पाणी‎ जाणार नाही. त्यामुळे गट नंबर १८६‎ मधील उंचावर टाकीसाठी जागेचे‎ बक्षिसपत्र करण्यात आले आहे. ही‎ जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असून,‎ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने त्यास‎ मंजुरी देऊन काम सुरु करण्याची‎ वर्कऑर्डर दिली आहे. हे काम‎ पोलिस बंदोबस्तात पूर्ण करण्याची‎ मागणी करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...