आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला दिन:नगरच्या महिलांचे साहसी क्षेत्रातील‎ कार्य खरंच गौरवास्पद : कर्नल धूल‎

नगर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक स्त्री म्हणून गिर्यारोहण, ट्रेकिंग,‎ प्रस्तरारोहण या साहसी क्षेत्रात योगदान‎ देणे निश्चितच सोपे नाही, परंतु जेव्हा एक‎ आई आपल्या मुलांसमोर असे स्वतःचे‎ आदर्श निर्माण करते, तेव्हा पुढची पिढी‎ नक्कीच धाडसी बनते. जेव्हा तुम्हाला‎ वाटेल, की आता आपण थकलोय, तेव्हा‎ तुमची खरी ताकद दाखवा, नक्की‎ यशस्वी व्हाल. तुम्ही जे काही कराल,‎ त्यात पूर्ण प्रयत्न करा. नगरच्या महिलांचे‎ साहसी क्षेत्रातील कार्य खरोखर‎ गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन‎ मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अ‍ॅड स्कूलचे‎ स्पोर्ट्स ऑफिसर कर्नल जे. एस. धूल‎ यांनी केले.‎

येथील ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेच्या‎ वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त‎ साहसी क्षेत्रात योगदान देणाऱ्या‎ सह्याद्रीच्या लेकींचा ‘सह्याद्री अचिवर्स‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अ‍ॅवार्ड’ देऊन गौरव करण्यात आला.‎ सोनाली धूल, प्रा. गिरीश कुकरेजा,‎ कामगार न्यायालयाचे न्यायाधीश शरद‎ देशपांडे, उद्धव शिंदे, संजय शिंदे, सीए‎ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र काळे,‎ ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेचे प्रमोद टोणपे,‎ भारती शेवते, सीमा चोभे, स्वप्नील गोरे,‎ राजेंद्र बोऱ्हाडे उपस्थित होते.‎ जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री‎ बिले, मॅरेथॉन रनर प्राची पवार, डॉ. स्मिता‎ उगले, कांचन पानसंबळ, अनूजा शिंदे,‎ एकता कनोजिया, ग्रीष्मा घोडके,‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बॅडमिंटनमधील राष्ट्रीय खेळाडू सई‎ काळे यांना ‘सह्याद्री अचिव्हर्स अ‍ॅवार्ड’‎ देऊन गौरव करण्यात आला.

तसेच‎ गिर्यारोहक अक्षय भापकर, सुरेश‎ जगदाळे, अमित सोनग्रा, आकाश‎ पातकळ यांचा प्रस्तरा रोहण मोहिमेत‎ सहभाग घेतला. त्याबद्दल सत्कार‎ करण्यात आला.‎ प्रा. गिरीश कुकरेजा यांनी ‘महिलांचे‎ गिर्यारोहण आणि तणावमुक्त जीवन’ या‎ विषयावर व्याख्यान दिले. महिलांकडून‎ परिवारातील सर्व जण अपेक्षा ठेवतात,‎‎‎‎‎‎‎‎‎‎ परंतु या अपेक्षा पूर्ण करता करता‎ महिलांनी स्वतः कडेही लक्ष दिलं पाहिजे.‎ स्वसंवाद साधण्यासाठी निसर्गाच्या‎ सान्निध्यात जाण्याचे आवाहन त्यांनी‎ केले.‎ यावेळी सोनाली धूल म्हणाल्या, की‎ आईने आपल्या मुलांच्या मनात भीती‎ निर्माण करु नये. त्यांना धाडशी बनवावे,‎ असे आवाहन केले. प्रास्ताविक संस्थेचे‎ अध्यक्ष रवींद्र चोभे यांनी केले. प्रा. प्रसाद‎ बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर‎ तेजस स्वामी यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...