आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाळा, महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थिंनींची छेड काढणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात येईल, असा इशारा शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक विलास पुजारी यांनी दिला. ढोरजळगाव येथील श्रीराम विद्यालय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुजारी बोलत होते. पुजारी म्हणाले, मुला मुलींनी मोबाईल वापरणे बंद करावे. सध्याच्या आधुनिक युगात नको त्या गोष्टी या मोबाइलमुळे घडत आहेत.
आपल्या मुलांना पालकांनी मोबाइल देऊ नये. कुठल्याही चुकीला आपल्या पाल्याला पालकांनी पाठीशी न घालता शिक्षा केली, तर पाल्य चांगला नागरिक घडू शकतो. जिद्द, चिकाटी असेल तर प्रतिकुल परिस्थितीतही विद्यार्थी प्रयत्न व अभ्यासाच्या जोरावर प्रशासकीय आधिकारी होऊ शकतो. यासाठी कॉपी न करता कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घ्याव्यात शाळेत कुठलेही वाईट कृत्य केल्यास कडक शासन करण्यात येईल मुलींनी न घाबरता न डगमगता प्रतिकार केला. वेळीच आवाज उठवला तर अशा घटना घडणार नाहीत.
कुठल्याही विद्यार्थ्याने गैरवर्तन केल्यास त्याला कडक शासन केले जाईल, असे पुजारी म्हणाले. याप्रसंगी शेवगाव पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे अंमलदार बप्पासाहेब धाकतोडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. शालेय वेळेत बाहेरगावाहून विद्यालय येणाऱ्या मुलींना रोडरोमिओंचा त्रास होऊ नये यासाठी शालेय दक्षता कमिटीची स्थापना करण्यात आली. त्यात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पालक यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी राजेंद्र देशमुख,महादेव पाटेकर, अनंता ऊर्किडे, गणेश कराड, प्राचार्य कांतेश्वर ढोले, पर्यवेक्षक सुनील आव्हाड, बीट हवालदार रामेश्वर घुगे, संभाजी लांडे, बाळासाहेब पाटेकर, देवीदास देशमुख, देविदास गिऱ्हे, कैलास देशमुख, सूर्यकांत गाडगे, गणेश पाटेकर, संभाजी देशमुख, संभाजी फसले, पत्रकार दीपक खोसे, कमलाकर गरड, रोहन साबळे, कृष्णकांत पाटेकर, आकाश साबळे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.