आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोन्याचे दागिने उजळून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत दागिने घेऊन दुचाकीवरून पळालेल्या दोघांना नागरिकांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव येथे घडली आहे. आर्यन अजय गुप्ता, तबारक मुबारक शेख रा. जमुनिया, भागलपूर बिहार असे अटक केलेल्या दोन आरोपींचे नाव आहे.
सोमवार दि. ५ रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी एका महिलेच्या घरी येऊन आम्ही कंपनीचे माणसे असून आम्ही पितळाचे भांडे, सोन्याचे तसेच चांदीचे दागिने उजळून देतो, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवत महिलेने कानातील अंदाजे अडीच ग्राम वजनाचे सोन्याची कर्णफुले तसेच सूनेचे अडीच ग्राम वजनाची सोन्याची अंगठी असे दागिने उजळण्यासाठी दिले. दोघा आरोपींनी दागिन्यांना पावडर आणि पाणी लावून डब्यात टाकल्यासारखे करत डबा बंद करत हळद टाकून गॅसवर १० मिनिट ठेवण्यास सांगितले आणि आरोपी निघून गेले.
काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार मुलाला सांगितला. मुलाने मित्रांच्या मदतीने दोघांचा शोध घेतला. दोन्ही आरोपींना लोणी व्यंकनाथ शिवारातील मडकेवाडी शिवारात दुचाकी क्र. एम एच १२ ई व्ही ७२३० वरून पळून जात असताना पकडले. श्रीगोंदे पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात निकिता घोडके यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास श्रीगोंदा पोलिस करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.