आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतिवृष्टीमुळे खरीप हंगामात कोपरगाव मतदार संघातील सर्वच गावातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. त्या नुकसानीचे पंचनामे देखील महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाकडून केले आहे. मात्र ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले असून उर्वरीत अनुदानाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. हे अनुदान तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्या अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोपरगाव मतदार संघात खरीप हंगाम २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन, मका, कापूस, बाजरी आदी खरीप पिकांचे तसेच कांदा रोप, भाजी पाला व चारा पिकांचे मोठे नुकसान होवून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता. अनेक ठिकाणी तर शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अजून अडचणीत आला होता.
नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर भरपाई अनुदान मिळेल, या आशेवर शेतकरी आजही अनुदानापासून वंचित आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेले आहेत, मात्र विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात जवळपास ३४ हजार हेक्टर क्षेत्राचे ४६,६९४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे २७.३५ कोटी व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ५३.९७ कोटी असे एकूण जवळपास ८१.३२ कोटी अनुदानाच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.