आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंचायतराज पद्धतीमध्ये जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाकडून ग्रामस्थांच्या मोठ्या अपेक्षा असतात. जनतेने निवडलेला सरपंच गावाला विकासाची दिशा देणार आहे. गावाच्या विकासासाठी निवडणुकीनंतर राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग यांनी केले. अखिल विश्व वारकरी परिषद (महाराष्ट्र राज्य) अहमदनगर शाखेच्या वतीने चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील जनतेमधून निवडून आलेले सरपंच शरद पवार व उपसरपंच जयश्री माधजी कोकाटे यांचा भालसिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचारणे, अण्णा कोकाटे, चंद्रकांत पवार, अमोल खडके, जितू गाडे, कल्याण जगताप, राम जगताप, ज्ञानेश्वर ठोंबरे, गंगाधर दरेकर, नामदेव थोरवे, शंकर कोकाटे, तुकाराम कोकाटे आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचारणे यांनी गावात सर्व राजकीय मंडळी विकासासाठी एकत्र येऊन काम करत आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळण्यासाठी नवनिर्वाचित सरपंचांनी प्रयत्नशील राहून काम करावे. सर्व समाजाला बरोबर घेऊन विकास कामे करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.