आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर तालुक्यातील पीर मिरावली दर्गा हे एक नगर तालुक्यातील ''क'' वर्ग तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी राज्यासह देशभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु, मागील अनेक दिवसांपासून येथे पाणीटंचाई निर्माण झाल्याने भाविकांचीही गैरसोय होत आहे. यापार्श्वभूमीवर भक्त समितीने प्रशासनाला निवेदन दिले असले तरी पाणीप्रश्न मार्गी लागलेला नाही.
मिरावली पहाड भक्त समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेला महिनाभरापूर्वी निवेदन दिले होते, परंतु प्रशासनाने हा प्रश्न सोडवला नाही. या ठिकाणी पाणी विकत घ्यावे लागत आहे, जर आठ दिवसात पिण्याची पाण्याची व्यवस्था झाली नाही तर भाविक आंदोलनाचा पर्याय निवडणार आहे. हजरत सय्यद इसहाक शाह पीर मिरावली दर्गा कापूरवाडी भागात आहेत. या ठिकाणी अस्तीत्वात असलेली पाणी योजना कार्यान्वीत नाही. त्यामुळे येणाऱ्या भाविकांचे व पर्यटकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. आठवडाभरात जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा भाविकांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.