आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण ‎:केलेल्या विकासकामांचे श्रेय घेऊन त्यावर‎ वारंवार चर्चा करण्याची आमची सवय नाही‎

पाथर्डी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची अथवा‎ वारंवार त्यावर चर्चा करण्याची आमची‎ सवय नाही. पण विरोधक त्या स्वभावाचे‎ भांडवल करून बदनाम करीत असतील,‎ तर कार्यपद्धतीत बदल करून कामे व‎ केलेले सहकार्य बोलून दाखवू. कामे‎ आम्ही करतो, पावत्या दुसरेच फाडतात,‎ अशा प्रवृत्तींना नवखे कार्यकर्ते बळी‎ पडतात. घरचीच माणसे कामाला येतात,‎ पाहुण्यांना पाहुण्यांसारखेच ठेवा, असे‎ आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी‎ केले.‎ पाथर्डी तालुक्यातील भालगाव,‎ मीडसांगवी, कासारवाडी, खरवंडी आदी‎ गावांचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्गाच्या‎ समस्येबाबत शासकीय विश्रामगृहावर‎ डॉ. विखे यांच्या भेटीसाठी आले.

गेल्या‎ अनेक दिवसांपासून पैठण-पंढरपूर व‎ खरवंडी-राजुरी-बीड या राष्ट्रीय‎ महामार्गाच्या कामामुळे विस्थापित‎ झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान‎ भरपाईबाबत मार्ग निघत नव्हता.‎ अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत व‎ लोकप्रतिनिधींना जुमानत नव्हते.‎ वादामुळे रस्त्याचे काम अपूर्ण राहिले‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ होते. याबाबत महामार्ग विभागाचे वरिष्ठ‎ अधिकारी, भाजपचे तालुकाध्यक्ष‎ माणिक खेडकर, दत्तात्रय पठाडे, माजी‎ नगराध्यक्ष अभय आव्हाड, अॅड. प्रतीक‎ खेडकर, अजय रक्ताते, जगन्नाथ‎ गुळवे, राजेंद्र हिंगे आदी कार्यकर्ते व‎ पदाधिकारी उपस्थित होते.‎ यावेळी खासदार डॉ. विखे म्हणाले,‎ अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांची‎ आडवणूक करू नये. विकास कामांतील‎ अडचणी सोडवण्यासाठी दोन दोन वर्षे‎ लागत असतील, तर ही गोष्ट दुर्लक्ष‎ करण्यासारखी नाही.

अडचणी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सोडल्यावर लोकांच्या मनात काम‎ करणाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवून‎ पूजार्पण करणाऱ्यांची नवीन टोळी तैयार‎ होत असेल, तर अशा प्रवृत्तींना सुद्धा‎ लोकांनी रोखायला हवे. येथे मार्च अखेर‎ दोन्ही महामार्गामुळे विस्थापित‎ झालेल्यांना नुकसान भरपाईची रक्कम‎ देण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले.‎ कल्याण-विशाखापट्टण,‎ बारामती-औरंगाबाद, पैठण-पंढरपूर,‎ औरंगाबाद-पुणे अशा महामार्गांमुळे येत्या‎ पाच वर्षांत पाथर्डी तालुका‎ दळणवळणाच्या दृष्टीने जिल्ह्यात अग्र‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ क्रमांकावर राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र‎ मोदी यांच्याकडे नगर जिल्ह्यातील सर्व‎ प्रमुख तीर्थक्षेत्रे नजरेपुढे ठेवून‎ विकासाचा नवा कॅरिडोर व्हावा, यासाठी‎ पाठपुरावा सुरू असून गहिनीनाथ गड,‎ भगवानगड, तारकेश्वर गड, मोहटा देवी,‎ मढी, वृद्धेश्वर, हनुमान टाकळी,‎ दगडवाडी, चिचोंडी, शिंगणापूर, शिर्डी‎ अशा मार्गाबाबत सर्वेक्षण व्हावे, यासाठी‎ प्रयत्न हाती घेतले आहेत, असेही विखे‎ यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे‎ तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी‎ यावेळी आभार मानले.‎

मुळा धरणाच्या पाण्यासाठी‎ संयुक्त बैठकीत निर्णय घेऊ‎ दळणवळणाशिवाय कोणतीही विकास‎ कामे शक्य नसल्याने लोकांनी सहकार्य‎ करावे. पाथर्डी तालुक्यातील काही‎ गावांनी मुळा धरणाचे ओव्हरफ्लोचे‎ पाणी मिळावे, अशी मागणी केली त्यावर‎ आमदार मोनिका राजळे यांच्याबरोबर‎ संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेऊ, असेही‎ नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे‎ यांनी पाथर्डी येथे शेतकऱ्यांसमोर‎ बोलताना सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...