आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:पहिल्या ध्वजारोहणाचे साक्षीदार‎ विजयस्तंभाचे सुशोभीकरण पूर्ण‎

श्रीरामपूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आयुष्य‎ पणाला लावणाऱ्या अनेक स्वातंत्र्य‎ सैनिकांच्या त्यागाचे प्रतीक म्हणून‎ स्वातंत्र्यापूर्वी उभारण्यात आलेल्या‎ बेलापुरातील विजयस्तंभाचे आकर्षक‎ नूतनीकरण करण्यात आले असून‎ बेलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीच्या‎ साक्षीचे प्रतीक म्हणून नव्या पिढीला‎ देशासाठी त्याग, समर्पण, एकता,‎ देशभक्तीच्या आठवणी ताज्या करून‎ देण्यासाठी नव्याने दिमाखात उभा आहे.‎

बेलापूर हे स्वातंत्र्य लढ्याच्या‎ चळवळीचे केंद्र समजले जात होते.‎ बेलापुरातील स्वर्गीय रामदयाळ नथमल‎ दायमा, बस्तीराम राणेजा, रुपाशेठ‎ श्रीगोड, फकिरचंद हबीराज बाठीया,‎ रामचंद्र नथमल वर्मा, सावळेराम‎ गोविंदराव उंडे, रामचंद्र राठोड,‎ अण्णासाहेब लक्ष्मण डोखे, गोविंदराव‎ काळे, केशवराव विष्णुपंत कुलकर्णी,‎ गणेश गंगाधर काळे, खेवराज जसराज‎ श्रीगोड, रुपचंद जसराज श्रीगोड,‎ छगनलाल जसराज श्रीगोड, शिवदास‎ जोशी, चुनीलाल ताथेड, डॉ.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बिहारीलाल गंगवाल, बबतपुरी गोसावी,‎ बाबुराव दगडू मुंडलिक, दगडू रोडे आदी‎ स्वातंत्र्य संग्रामाचे लढवय्ये व शिलेदार‎ स्वातंत्र्यसैनिक होते. १५ आॅगस्ट १९४७‎ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. गावात‎ मध्यरात्री जल्लोष करण्यात आला. १५‎ आॅगस्ट १९४७ रोजी सकाळी तत्कालीन‎ स्वातंत्र्य सैनिकांचे उपस्थितीत तिरंग्याचे‎ ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी‎ प्रभात फेरीही काढण्यात आली होती.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गेल्या ७५ वर्षांपासून आजतागायत‎ बेलापूरला १५ आॅगस्ट व २६ जानेवारी‎ रोजी सार्वजनिक ध्जवंदनाची परंपरा‎ सुरू आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी‎ हा ध्वजस्तंभ अस्तित्वात असावा.‎ दरम्यान सन १९८७ चे सुमारास‎ तत्कालीन सरपंच स्व. मुरलीशेठ यांनी‎ विजयस्तंभाचे नुतणीकरण केले. यावर्षी‎ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि‎ ग्रामपंचायतीचा शताब्दी महोत्सवानिमिंंत्त‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या‎ निधीतून सरपंच महेंद्र साळवी,‎ उपसरपंच अभिषेक खंंडागळे यांनी‎ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून‎ सुशोभीकरण केले. बेलापूरचे भूमिपुत्र‎ पुणे येथील ख्यातनाम शिल्पकार प्रशांत‎ विनायक बंगाळ यांचे अभिनव व विविध‎ प्रतिकांचा वापर करून विजय स्तंभाचे‎ सुशोभीकरण करीत आहेत. याचंे काम‎ पूर्णत्वाकडे गेले आहे.‎

भुईकोट किल्ल्याच्या‎ धर्तीवर ठरली वेळ‎ स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भुईकोट किल्ल्यात‎ आचार्य नरेंद्र देव हे स्थानबद्ध होते.‎ स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी १५ ऑगस्ट‎ १९४७ रोजी किल्ल्यातील फत्तेपूर‎ बुरुजावर सकाळी नऊ वाजता तिरंगा‎ फडकावला. त्याचवेळी बेलापुरातील‎ विजयस्तंभावरही तिरंगा फडकावला‎ गेला. तीच वेळ आजही पाळली जात‎ आहे. दरम्यान हा विजयस्तंभ श्रीरामपूर‎ शहरासह तालुक्यातील युवकांसाठी‎ देशभक्तीचे प्रेरणास्थान आहे.‎

झेंडा चौक ते‎ विजयस्तंभ चौक‎ येथे झेंडा फडकावला जायचा म्हणून‎ पूर्वी या ठिकाणाला झेंडा चौक म्हटले‎ जायचे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर‎ झालेल्या आनंदात येथे तिरंगा‎ फडकावला गेला आणि या चौकात‎ आनंदोत्सव साजरा केला गेला म्हणून‎ विजयस्तंभ चौक संबोधले जाऊ‎ लागले. नवीन पिढीला या‎ विजयस्तंभाची महती या सुशोभीकरण‎ कामाच्या माध्यमातून होणार आहे.‎ त्यामुळे हे काम तत्परतेने पूर्ण केले गेले.‎

श्रीरामपूर शहरातील हाच तो विजयस्तंभ‎ भुईकोट किल्ल्याच्या‎ धर्तीवर ठरली वेळ‎ स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भुईकोट किल्ल्यात‎ आचार्य नरेंद्र देव हे स्थानबद्ध होते.‎ स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी १५ ऑगस्ट‎ १९४७ रोजी किल्ल्यातील फत्तेपूर‎ बुरुजावर सकाळी नऊ वाजता तिरंगा‎ फडकावला. त्याचवेळी बेलापुरातील‎ विजयस्तंभावरही तिरंगा फडकावला‎ गेला. तीच वेळ आजही पाळली जात‎ आहे. दरम्यान हा विजयस्तंभ श्रीरामपूर‎ शहरासह तालुक्यातील युवकांसाठी‎ देशभक्तीचे प्रेरणास्थान आहे.‎

बातम्या आणखी आहेत...