आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय संविधानाने महिलांना समानतेचा हक्क दिलेला आहे. महिलांना आपल्या हक्काची जाणीव असली पाहिजे. त्यासाठी महिला सबलीकरण अभियान राबविले जात असल्याचे प्रतिपादन अहमदनगर न्यायालयातील अॅड. स्वाती नगरकर यांनी केले. आजीवन अध्ययन व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजीवन अध्ययन व विस्तार कार्यक्रमा’अंतर्गत ‘महिला सबलीकरण’ विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर थोपटे होते. अनेक कर्तृत्ववान महिलांचा उल्लेख करताना, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. मनीषा पुंडे म्हणाल्या, की शारीरिक, मानसिक, बौध्दीकदृष्ट्या महिला सक्षम असतील, तर त्या जीवनातील विविध क्षेत्रात यश संपादन करू शकतात. स्त्रियांमध्ये आत्मविश्वास व साहस निर्माण करणे, हेच महिला सबलीकरणाचे उद्दिष्ट आहे. प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत देसाई यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शुभांगी ठुबे यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. भास्कर निफाडे, डॉ. आंबेकर, प्रा. इंदापुरे, महाविद्यालयातील विद्यार्थिनी व अध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. डॉ. अंजली खिलारी यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.