आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला कधीच अशक्त नव्हती, कारण संगोपनाची जबाबदारी ती सक्षमपणे पार पाडत असते. त्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण महिलांना निसर्गत: मिळालेले असतात. विविध कौशल्य आत्मसात करून परिवारासोबत समाजात खंबीरपणे उभे राहण्याची क्षमता महिलांमध्ये असते, असे प्रतिपादन ए.आय.एफ.चे समुपदेशक डॉ. विश्वास केदारी यांनी केले.
के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच ‘तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण’ कार्यशाळा झाली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. विश्वास केदारी बोलत होते. समुपदेशिका के. विपुलता, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, महिला तक्रार निवारण समितीचे प्रमुख डॉ. सुरेखा भिंगारदिवे, प्रा. डॉ. विजय ठाणगे आदी उपस्थित होते.
ए.आय.एफ.च्या समुपदेशिका के. विपुलता यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. महिलांमध्ये निर्णय क्षमता विकसित करण्यासह स्त्री अस्मितेसाठी अशा कार्यशाळेची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी महिला तक्रार निवारण समितीचे कार्य व कर्तव्य अधोरेखित करताना, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची दखल घेण्याचे काम सर्वप्रथम अंतर्गत तक्रार निवारण समिती करीत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक समितीच्या प्रमुख डॉ. सुरेखा भिंगारदिवे यांनी, तर पाहुण्यांचा परिचय डॉ. एस. के. बनसोडे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा कडू यांनी, तर आभार समितीच्या सदस्या प्रा. वर्षा आहेर यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.