आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे सोमवारी १० एप्रिलला अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली आहे. या वेळी शेतकऱ्यांची लिंबू पीक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. सोबतच वाडेगाव येथील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदन देऊन परिसरात हवामान आधारित आंबिया बहार योजनेमधून वगळण्यात आलेल्या लिंबू व फळ पिकांचा पुन्हा समावेश करण्याची मागणी केली. हवामान बदलाच्यानुसारमध्ये आंबिया बहारचा समावेश असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना विपरीत हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. तरी शेतकऱ्यांना फळपीक विमामध्ये जर समावेश केला तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.