आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने शासकीय जागांवरील अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरु झालेल्या असून नगर पालिका प्रशासनाने आतापर्यंत शहरातील ७०० अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या असून यापैकी २०० जणांनी याबाबत हरकती नोंदवल्या आहेत. शासकीय व गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्यावर अतिक्रमण कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आलेली असून ३१ डिसेंबरपर्यंत सर्व अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे.
त्यानुसार खामगाव नगर पालिकेच्या वतीने शहरातील ७०० अतिक्रमण धारकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. यावर हरकती नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आलेली असून आतापर्यंत शहरातील २०० अतिक्रमणधारकांनी आपल्या हरकती नोंदवल्या असल्याची माहिती न.प.प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. हरकतींवर सुनावणी होवून शासकीय जागेवरील अतिक्रमण असल्याचे सिध्द झाल्यानंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाणार आहे. आता या हरकतींवर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.