आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिंदखेडराजा तालुक्यातील माळसावरगाव येथील ईश्वेद बायोटेकने ग्रामीण भागात नवी कृषी क्रांती केली असून, आधुनिक ऊतिसंवर्धित तंत्रज्ञानाने फळबाग व वनशेती रोपे विकसित केली आहेत.
यामध्ये आणखी भर पडली असून, केळी या पिकात रोगमुक्त आणि चांगले उत्पादन देणारे वाण विकसित करण्यासाठी ईश्वेद बायोटेक व इस्त्रेल कंपनीमध्ये करार झाला आहे.१६ डिसेंबर रोजी झालेल्या या कराराद्वारे ईश्वेद टिश्यू कल्चर प्लांट आणि सीड्स निर्यात करणार आहे. तसेच इस्त्रेल तंत्रज्ञानही देवाण-घेवाण करणार असल्याने हा करार ईश्वेद आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे, अशी माहिती ईश्वेद बायोटेकचे कार्यकारी संचालक संजय वायाळ, अक्षय वायाळ यांनी दिली आहे.
ईश्वेद बायोटेकने टिश्यू कल्चर प्लांट आणि बियाणे क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी केळीसह पेरू, डाळींब, आंबा, जांभूळ, कीवी, अंजीर तसेच सीताफळाची रोपे उपलब्ध करून दिली आहेत. यासोबतच फळबाग व भाजीपाला या क्षेत्रात ईश्वेद बायोटेक शेतकऱ्यांना आधुनिकतेची कास धरायला लावत दर्जेदार रोपे उपलब्ध करून देत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.