आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोणार तालुक्यातील बिबी पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वीर पांगरा येथे ४ जानेवारीच्या रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञाताने तीन एकरातील तुरीची गंजीला आग लावल्याची घटना उघडकीस आली. लावलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनांमुळे ग्रामीण भागात शेतमालाच्या सुड्यांना आग लावण्याच्या घटना थांबताना दिसून येत आहे. सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. वीर पांगरा येथील शेतकरी विठोबा तुकाराम जायभाये त्यांच्या तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावली.
ही घटना ४ जानेवारीच्या रात्री दोन वाजेच्या सुमारास गावकऱ्यांच्या लक्षात आली. परंतु या घटनेत संपूर्ण सुडीची राख झालेली होती. या घटनेत तुरीची सुडी जळाल्याने अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी पुत्र योगेश जायभाये यांनी सांगितले. असे प्रकार बिबी पोलिस स्टेशन हद्दीत सतत घडत आहेत. परंतु कारवाई केल्या जात नसल्याचा आरोपही शेतकऱ्याने केला आहे. या प्रकरणी नवनियुक्त ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.