आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरावर गौरव‎:महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी‎ योजनेत राज्यात बुलडाणा जिल्हा अग्रेसर‎

बुलडाणा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

//"महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार‎ हमी योजना - महाराष्ट्र अंतर्गत राज्यामध्ये‎ विहित मुदतीत मजुरी अदायगी करण्यात‎ जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याने‎ बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य‎ कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते‎ यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला.‎ जिल्हयामध्ये जे मजूर श्रमाचे काम‎ करण्यास तयार आहेत, अशा मजुरांना‎ गावातच अकुशल स्वरूपाचा रोजगार‎ उपलब्ध करून देण्याकरता महात्मा गांधी‎ राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना‎ महाराष्ट्र अधिनियम-२००५ राबवण्यात येत‎ आहे.

सोबतच गावांमध्ये शाश्वत‎ स्वरूपाची मालमत्ता निर्माण करणे व पात्र‎ लाभार्थ्यांना निकषानुसार वैयक्तीक‎ स्वरूपाची कामे देऊन त्यांच्या उत्पन्नात‎ वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावणे हा‎ उद्देश आहे.या योजनेमध्ये मजुरांना‎ रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ त्यांची मजुरी ठरवून दिलेल्या वेळेतच ८‎ दिवसांत मजुरी मजुरांच्या बँक खात्यामध्ये‎ जमा करणे बंधनकारक केलेले आहे.‎ जिल्ह्यात मागील सतत ४ वर्षापासुन‎ मजुरांना त्यांची मजुरी ८ दिवसांत अदा‎ करण्यात येत आहे.

या बाबतीत महाराष्ट्रात‎ जिल्हा अग्रेसर असुन या उत्कृष्ट कामाची‎ दखल राज्यस्तरावर घेण्यात येऊन ३ मार्च,‎ २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई‎ येथे राज्यपाल ,मुख्यमंत्री व मा. मंत्री‎ (रोहयो), यांचे हस्ते व राज्याचे अप्पर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मुख्य सचिव (रोहयो) आयुक्त मनरेगा‎ नागपूर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी‎ एच. पी. तुम्मोड, मुख्य कार्यकारी‎ अधिकारी भाग्यश्री विसपुते, पंचायत‎ समिती चिखली, खामगाव, संग्रामपूर चे‎ गट विकास अधिकारी, जिल्हा एम आय‎ एस समन्वयक सचिन श्रीवास्तव व इतर‎ कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.‎ तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी‎ (ग्रा.पं.) मोहोड, उपजिल्हाधिकारी‎ (रोहयो) माचेवाड यांचा सत्कार केला.‎

बातम्या आणखी आहेत...