आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्ञानगंगा अभयारण्यात पक्ष्यांंच्या पिण्याच्या पाण्याची सोय करून वन्यजीव सोयरे या संस्थेने आज दि.५ मार्च रोजी होळी सण साजरा केला. होळी हा सण आगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. हिवाळा ऋतूचे उन्हाळ्यात रूपांतर होत असते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देखील होळीनिमित्त येथील वन्यजीव सोयरे यांनी रविवार, दि. ५ मार्च रोजी ज्ञानगंगा अभयारण्यात जात सहा ठिकाणी वनातील पक्ष्यांचा विचार करून पाणी मातीचे २५ पॉट लावले. होळी या सणापासून ऋतूत बदल होऊन हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात होते.
येत्या उन्हाळ्यात पशू पक्षांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत या उद्देशाने ही अनोख्या होळी साजरी करण्यात आली. हा उपक्रम २०१६ पासून वन्यजीव सोयरे सातत्याने राबवत असून भविष्यात देखील राबवणार आहे. वन्यजीव सोयरे डॉ.रवि शिंदे, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराजसिंह चव्हाण यांनी पाण्याच्या मातीच्या पॉट मोहिमेला उपलब्ध करून दिले. या मोहिमेत वन्यजीव सोयरे शाम राजपूत, प्रशांत राऊत, श्रीकांत पैठणे, कैलाश गणगे, प्रदीप वनारे आणि वन्यजीव सोयरेंचे नितिन श्रीवास्तव यांनी परिश्रम घेतले. तर फॉरेस्ट गाइड श्रीधर अंभोरे, कर्मचारी तेजराव राठोड, ताकतोडे यांनी मोहिमेत सहभागी होत सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.