आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या!‎:आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी‎

देऊळगावराजा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टी आणि सततच्या‎ पावसामुळे झालेल्या पिकांची‎ नुकसान भरपाई तत्काळ देण्यात‎ यावी, तसेच भरपाई मधून‎ वगळण्यात आलेल्या महसूल‎ मंडळांचा समावेश करून मदत‎ द्यावी, अशी या मागणी आमदार डॉ.‎ राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे. या‎ संदर्भात त्यांनी आज, दि. ३ एप्रिल‎ रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि‎ कृषिमंत्र्यांना पत्र दिले.‎ सिंदखेडराजा मतदारसंघात‎ अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचे‎ प्रमाण जास्त आहे त्यामुळे‎ शेतमालाचे मोठ्या प्रमाणात‎ नुकसान झाले अाहे. शेतकऱ्यांना दि.‎३१ मार्चपर्यंत‎देण्यात‎सर्वतोपरी मदत‎देण्यात येईल‎असे आश्वासन‎ विधिमंडळात शासनाच्या वतीने‎ देण्यात आले होते.

परंतु, शेतकऱ्यांना‎ अद्यापही नुकसान भरपाई मिळाली‎ नाही. अतिवृष्टी आणि सततच्या‎ पावसामुळे झालेल्या नुकसान‎ भरपाईचा अहवाल शासनाकडे‎ सादर करण्यात आला आहे. परंतु,‎ देऊळगावराजा तालुक्यातील‎ देऊळगावमही, अंढेरा,‎ देऊळगावराजा, तुळजापूर,‎ मेहुणाराजा, लोणार तालुक्यातील‎ अंजनी खुर्द, बीबी, चिखली‎ तालुक्यातील मेरा, शेळगाव‎ आटोळ, तसेच सिंदखेडराजा‎ तालुक्यातील साखरखेर्डा, शेंदुर्जन,‎ सिंदखेडराजा, किनगावराजा,‎ सोनोशी, दुसरबीड या महसूल‎ मंडळांना अतिवृष्टीच्या यादीतून‎ वगळण्यात आले आहे. त्यांचाही‎ अतिवृष्टी आणि सततच्या‎ पावसाच्या नुकसानी मध्ये समावेश‎ करण्यात यावा, तसेच शेतकऱ्यांना‎ तत्काळ नुकसान भरपाई देण्यात‎ यावी, अशी मागणी आ. डॉ. राजेंद्र‎ शिंगणे यांनी या पत्राद्वारे केली आहे.‎