आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिन्याच्या पहिल्या शनिवारी आपल्या स्वतःच्या मूळ गावात जाऊन एक तास राष्ट्रवादीसाठी !आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी ! हा उपक्रम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मूळ गावामध्ये सर्व गावकऱ्यांना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून बैठक घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे बुलडाणा विधानसभा अध्यक्ष नरेश शेळके यांनी केले. अंत्री तेली येथे एक तास राष्ट्रवादीसाठी कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी, करण्यात आले होते. यावेळी नरेश शेळके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सव अंत्री तेलीच्या सरपंच इंदुबाई विलास शेळके तर प्रमुख उपस्थिती जिल्हा उपाध्यक्ष बी.टी जाधव, जिल्हा सरचिटणीस पी .एम. जाधव, माजी कृषी सभापती लक्ष्मी शेळके, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष विजया कोळसे, महिला तालुकाध्यक्ष मंगला वायाळ या होत्या. यावेळी शेळके म्हणाले की, जनतेशी सुसंवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी आणि पक्षाचे कार्य, व ध्येय धोरण सांगून पक्ष संघटना मजबूत करावी.
या उपक्रमामुळे पक्ष नेतृत्वाची नाळ जनतेशी जुळत आहे. असा हा स्तुत्य उपक्रम महिन्यातून एक वेळेस व स्वतःच्या मूळ गावापुरता मर्यादित न ठेवता नियमित व प्रत्येक गावात राबवू, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. एम. जाधव यांनी केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बी. टी. जाधव, उपसरपंच विजय सातपुते ग्रामपंचायत सदस्य मुकेश तायडे यांनी ही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी माजी सरपंच ज्ञानेश्वर शेळके, माजी सरपंच श्रीकृष्ण डुकरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रभाकर काळवाघे, ग्रा.पं.सदस्य स्वाती भालेराव, माजी उपसरपंच विठोबा कळवाघे, गुलाबराव अंभोरे यांच्यासह गावकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल इंगळे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.